शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

युतीमुळेच भाजपचे पंचवीस वर्षे झाले नुकसान

By admin | Updated: April 30, 2015 00:29 IST

बाळ माने : राजकारणातील पोकळी भरून काढण्यास भाजपला अपयश आल्याची कबुली

मंडणगड : पंचवीस वर्षांच्या युतीच्या राजकारणात भाजपचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राजकारणात पोकळी निर्माण होऊन ती भरुन काढण्यास पार्टीस अपयश आले त्याचा फटका सर्वच निवडणुकात सोसावा लागला आहे, अशी कबुली प्रतिपादन भाजपा प्रदश प्रवक्ते बाळ माने यांनी मंडणगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.भाजपा सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचा दौरा करणाऱ्या माने यांनी विविध प्रश्नावर पत्रकारांशी संवाद साधला. यात आगामी काळात जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजपा-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वबळावरील निवडणुका हा पक्षासमोर अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.निवडणुकांमध्ये पक्षाचे अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी कार्यकर्ते कामास लागले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवेचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे वास्तवात आणण्यासाठी हे गाव दत्तक पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या आदर्श ग्राम विकास योजनेच्या घोषणेअंतर्गत खासदार अमर सांबळे यांनी दत्तक घेतले असल्याचे त्यांनी सांगीतले.जिल्ह्यात एक लाख सदस्य नोंदणी व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मिशन थर्टीप्लस या दोन विषयांवर भाजपने जिल्ह्यात आपले लक्ष केंदी्रत केले आहे, असे ते म्हणाले. कोकणातील पक्षाची व्याप्ती लक्षात घेता अगदी ग्रामपंचायत स्तरापासून पक्षाचे काम वाढेल, यावर लक्ष देण्यात आले असून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शक्य आहे तेथे उमेदवार उभे करण्यात आले. देवगड, गुहागर व रत्नागिरी मतदारसंघांपुरती पक्षाची ओळख मर्यादित न ठेवता सर्वच ठिकाणी वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. २०१७ जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती गण बांधण्याचे काम सुरु आहे. तालुक्यात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न सुरू असून येथे लघु उद्योगांची निर्मिती करुन पर्यटन मत्सव्यवसायाचे माध्यमातून रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत, असे माने यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन थोरे, उपाध्यक्ष राजेश नगरकर, युवा आघाडी तालुकाध्यक्ष गिरीष जोशी आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)