शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

युतीमुळेच भाजपचे पंचवीस वर्षे झाले नुकसान

By admin | Updated: April 30, 2015 00:29 IST

बाळ माने : राजकारणातील पोकळी भरून काढण्यास भाजपला अपयश आल्याची कबुली

मंडणगड : पंचवीस वर्षांच्या युतीच्या राजकारणात भाजपचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राजकारणात पोकळी निर्माण होऊन ती भरुन काढण्यास पार्टीस अपयश आले त्याचा फटका सर्वच निवडणुकात सोसावा लागला आहे, अशी कबुली प्रतिपादन भाजपा प्रदश प्रवक्ते बाळ माने यांनी मंडणगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.भाजपा सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचा दौरा करणाऱ्या माने यांनी विविध प्रश्नावर पत्रकारांशी संवाद साधला. यात आगामी काळात जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजपा-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वबळावरील निवडणुका हा पक्षासमोर अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.निवडणुकांमध्ये पक्षाचे अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी कार्यकर्ते कामास लागले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवेचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे वास्तवात आणण्यासाठी हे गाव दत्तक पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या आदर्श ग्राम विकास योजनेच्या घोषणेअंतर्गत खासदार अमर सांबळे यांनी दत्तक घेतले असल्याचे त्यांनी सांगीतले.जिल्ह्यात एक लाख सदस्य नोंदणी व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मिशन थर्टीप्लस या दोन विषयांवर भाजपने जिल्ह्यात आपले लक्ष केंदी्रत केले आहे, असे ते म्हणाले. कोकणातील पक्षाची व्याप्ती लक्षात घेता अगदी ग्रामपंचायत स्तरापासून पक्षाचे काम वाढेल, यावर लक्ष देण्यात आले असून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शक्य आहे तेथे उमेदवार उभे करण्यात आले. देवगड, गुहागर व रत्नागिरी मतदारसंघांपुरती पक्षाची ओळख मर्यादित न ठेवता सर्वच ठिकाणी वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. २०१७ जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती गण बांधण्याचे काम सुरु आहे. तालुक्यात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न सुरू असून येथे लघु उद्योगांची निर्मिती करुन पर्यटन मत्सव्यवसायाचे माध्यमातून रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत, असे माने यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन थोरे, उपाध्यक्ष राजेश नगरकर, युवा आघाडी तालुकाध्यक्ष गिरीष जोशी आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)