शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्येअभावी बारा शाळा बंद

By admin | Updated: December 2, 2014 00:20 IST

तीन वर्षांतील अवस्था : शाळा बनल्या गोठे, जुगाऱ्यांचे अड्डे

भारत चव्हाण -कोल्हापूर -महानगरपालिकेने आपल्या प्राथमिक शाळांना महान व्यक्तींची, समाजधुरिणांची, क्रांतिकारकांची नावे देऊन संस्कार घडविणाऱ्या या शाळा महान व्यक्तींचे स्मारक म्हणूनच उभ्या केल्या; परंतु शाळा बंद पडल्यावर इमारतीच्या माध्यमातून उभी असलेली ही स्मारके उद्ध्वस्त झाली आहेत. बंद शाळा या जनावरांचे गोठे, भटक्या जनावरांचे, व्यक्तींचे आश्रयस्थान आणि मद्यपी व जुगाऱ्यांचे अड्डे बनले आहेत. अक्षरश: करोडो रुपयांच्या या इमारतींना अवकळा आली आहे; परंतु याचे शल्य ना महापालिकेला आहे ना परिसरातील नागरिकांना! विद्यार्थ्यांच्या पुरेशा पटसंख्येअभावी पालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने दोन वर्षांपूर्वी शहरातील सात शाळा बंद केल्या आहेत, तर यंदाच्या (२०१४-२०१५) शैक्षणिक वर्षापासून पाच शाळा बंद केल्या आहेत. महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजाराम महाराज, अण्णा भाऊ साठे, पंडित जवाहरलाल नेहरू, महाराणी ताराबाई, रमाबाई आंबेडकर, छत्रपती पद्माराजे, छत्रपती विजयमाला, न्यायमूर्ती रानडे, रंगराव साळुंखे, अशा मान्यवरांची नावे शाळांना दिली. राजारामपुरीतील अण्णा भाऊ साठे विद्यालयाची इमारत जनावरांचा गोठा म्हणून वापरली जात आहे. आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या शेळा-मेंढ्या या इमारतीत बांधल्या जातात. शाळेच्या आवारात शेळ्यांच्या लेंढ्या व मुत्राने दुर्गंधी पसरलेली असते. शाळा इमारत मात्र भकास झाली आहे. कारण शाळेत यायला विद्यार्थीच नाहीत. राजारामपुरीसारख्या महागड्या परिसरात छत्रपती राजाराम विद्यालय व छत्रपती विजयमाला कन्या विद्यामंदिरची इमारतही अशाच बेवारस पडलेल्या आहेत. राजाराम विद्यामंदिर आवार आता भटकी कुत्री, जनावरे आणि दिवसाही ‘नशेत टाईट’ असणाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. या शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींचे ग्रुप बसलेले असतात. रस्सा मंडळाच्या पार्ट्या सुरू असतात. जून महिन्यापासून या शाळेत उर्दू मराठी स्कूल ही शाळा भरविण्यात येत आहे. परंतु या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सकाळी पहिले दोन तास परिसर स्वच्छ करण्यात जातात. छत्रपती विजयमाला कन्या शाळेभोवतीचा परिसर हा पार्किंगचा अड्डा बनला असून, शाळेच्या भिंती म्हणजे मुतारीचा आडोसा म्हणून नागरिक त्याचा वापर करतात. मंगळवार पेठेतील महाराणी ताराबाई विद्यालय (मुले) या शाळेचीही दुरवस्था दिसून येते. या शाळेच्या खिडक्या, दरवाजे तोडले गेले आहेत. रात्रीच्यावेळी अनैतिक प्रकार येथे चालतात. वारसदारांनीच पुसले वडिलांचे नाव शार्दुल भाऊसाहेब पाटील विद्यालय नावाची एक शाळा महापालिकेने चालविली होती; परंतु विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याचे कारण देत काही कारभाऱ्यांनी ही शाळा बंद केली. वर वर पटसंख्येचे कारण दाखविले गेले असले तरी शाळेची असलेली मौल्यवान जागाच खरे कारण होते. कारभाऱ्यांनी ही शाळा बंद करताना आंबा पाडला; परंतु ज्यांचे नाव शाळेला देण्यात आले होते, त्यांच्या वारसदारांनीही त्यात हस्तक्षेप केला नाही. शाळा बंद का करताय म्हणून जाब विचारला नाही. अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने सुरू झालेली शाळा आता बंद झाली, पण शाळा पुन्हा सुरू व्हावी, अशी अपेक्षा आहे; परंतु स्थानिक राजकारणामुळे ही शाळा सुरू होणे रखडले आहे. याच शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या हुद्द्यांवर आहेत. - कुमार दाभाडेमहापालिकेच्या शाळा म्हणजे थोर माणसांची जिवंत स्मारकेच होती. आता शाळा बंद केल्यामुळे नव्या पिढीला या थोर माणसांबद्दल कसे कळणार? त्यांचा आदर्श कसा घेता येईल. गोरगरीब मुलांच्या शाळांचे अस्तित्व टिकविले पाहिजे.- निर्मला निंबाळकर शाळेत पहारेकरीच नाहीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वच शाळेत रात्रीच्या वेळी पहारेकरी नाहीत. त्यामुळे या शाळा म्हणजे मद्यपी, जुगाऱ्यांचे अड्डे बनले आहेत. प्राथमिक शिक्षण मंडळाने आपल्या शाळांची रखवालदारी करण्याकरिता ६० कामाठी पहारेकरी नेमले होते; परंतु अलीकडच्या काही वर्षांत ‘कशाला पाहिजेत शाळा राखायला वॉचमन’ अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खुज्या मानसिकतेतून हे कामाठी वॉचमन महापालिकेने वेगवेगळ्या विभागात वसुलीसाठी नेमून घेतले आहेत. त्यामुळे शाळांचे पावित्र्य मात्र रात्रीच्या अनैतिक गोष्टींमुळे नष्ट झाले आहे. शिवाय लोखंडी साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाणही अधिक आहे.दोन वर्षांपासून बंद पडलेल्या शाळा अण्णा भाऊ साठे विद्यालयरंगराव साळुंखे विद्यालय महाराणी ताराबाई वि. (मुले)मुलींची शाळा क्रमांक ५ पद्माराजे विद्यालय (मुले)पद्माराजे विद्यालय (मुली)नेहरू कन्या विद्यामंदिर