शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तुकाराम मुंढेंची ‘दम’दार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 02:35 IST

कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या

पुणे : कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत बेशिस्तीला लगाम घालण्याची आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी कामाच्या वेळेत बदल करण्याबरोबरच कामकाजात शिस्त आणण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांना मुंढे यांच्या कामाचा ‘दम’दार अनुभव आल्याची चर्चा ‘पीएमपी’त रंगली आहे.मुंढे यांनी ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तासाभरात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, महाव्यवस्थापक (वाहतूक) अनंत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले, प्रशासन अधिकारी विजयसिंह परदेशी यांच्यासह अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.मुंढे यांनी बैठकीत पीएमपीच्या कामकाजाचा आढावा घेत सद्य:स्थिती जाणून घेतली. कामातील शिस्तीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे आग्रही भूमिका मांडली. पीएमपीची सध्याची कामाची वेळ सकाळी साडेदहा ते सायंंकाळी साडेपाच ही आहे. या वेळेत बदल करण्याचे आदेश मुंढे यांनी दिली. त्यानुसार आता ही वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ अशी आठ तासांची असेल. तसेच ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाण, मार्गावरील बसची संख्या यावरून नाराजी व्यक्त करीत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. (प्रतिनिधी)हेल्पलाइन सक्षम करामुंढे यांनी बैठकीतच आपल्या मोबाइलवरून पीएमपीच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला. मोबाइल स्पीकर मोडवर ठेवला होता. पाच-सहा रिंग वाजल्यानंतरही हेल्पलाइनवरून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून अधिकारीही स्तब्ध झाले. अखेर प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंढे यांनी संबंधित कर्मचाऱ्याची हेल्पलाइनवर झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांनाही हेल्पलाइन सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. तक्रार आल्यानंतर त्याचे २४ तासांत निराकरण करून संबंधितांना कळवावे, असा आदेश दिला. आयटीचा वापर वाढविणारडॉ. श्रीकर परदेशी तसेच इतर अधिकाऱ्यांनी घेतलेले चांगले निर्णय पुढेही कायम ठेवले जातील. परदेशी यांनी माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) वापर वाढवला होता. ‘आयटी’च्या उपयोगामुळे कार्यक्षमता वाढते. पारदर्शकताही येते. पर्यायाने संंस्थेच्या कामकाजातही सुधारणा होतात. त्यादृष्टीने अडचणींचा अभ्यास करून त्याचा विचार केला जाईल, असे सांगून मुंढे यांनी ‘आयटी’चा वापर वाढविण्याचे संकेत दिले.पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी मुंढेसूत्रीअधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वेळा पाळायला हव्यात.वाहक, चालकांनी आगारातून बस बाहेर काढताना एक मिनिटही उशीर करू नये. कर्मचाऱ्यांनी गणवेश घातलाच पाहिजे. चहा पिण्यासाठी बाहेर जाऊन वेळ घालवत कोठेही भटकू नये. बाहेर पडताना तशी नोंद करणे अपेक्षित आहे. धूम्रपान केलेले चालणार नाही.