शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पळपुट्या पाकचे शेपूट वाकडे ते वाकडेच - उद्धव टाकरे

By admin | Updated: August 24, 2015 12:16 IST

भारताने शेजारधर्माच्या बाता केल्या तरी पाकने फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याचा हट्ट कायम राखल्याने पाकचे शेपूट वाकडेच राहणार याचा प्रत्यय आल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - हिंदुस्थानने शेजारधर्माच्या बाता करीत पाकिस्तानचे वाकडे शेपूट सरळ करण्याचा प्रयत्न केला असला तरी फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याचा हट्ट कायम राखल्याने पाकचे शेपूट वाकडेच राहणार याचा प्रत्यय आला अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानवर केली आहे. तसेच हिंदुस्थान-पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांत चर्चा झालीच असती तरी संबंध सुधारले असते व ‘ऑल इज वेल’ घडले असते, या भ्रमात कोणी राहू नये. पाकिस्तानशी कोणतीही चर्चा झाली तरी त्यातून निष्पन्न काय होणार, असा प्रश्न विचारत चर्चेतून पळ काढून पाकिस्तानने त्यावर शिक्कामोर्तबच केल्याचेही उद्धव यांनी म्हह्टले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून पाकवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. 
काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी चर्चा करणे म्हणजे दोन देशांतील करार व समझोत्याचे उल्लंघन आहे, पण पाकिस्तान हा शब्दाला जागणारा देश नाही व या देशात लोकशाहीचे अस्तित्व नाही. या देशाचे ‘मालक’ दहशतवादी टोळ्या असून त्यांच्या मर्जीनुसार तो देश चालत असतो. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा करून तरी काय उपयोग असा सवालही उद्धव यांनी विचारला आहे. दोन देशांत चर्चा फक्त दहशतवादावर होईल व तिसर्‍या कुणालाही या चर्चेत आणायचे नाही असे ठरलेले असतानाही पाकिस्तानने काश्मीरमधील अतिरेक्यांना व फुटीरतावाद्यांना चर्चेसाठी बोलवावे हे त्यांच्या विश्‍वासघातकी प्रवृत्तीस साजेसेच असल्याचा टोलाही त्यांनी हाणला आहे. ‘रॉ’सह अनेक गुप्तचर संस्थांत काम केलेले भारताचे अजित डोवल यांच्या तुलनेत पाकिस्तानचे सरताज अजिज तसे कुचकामीच आहेत व डोवल यांच्यासमोर ते साफ फिकेच पडत असल्याची टीका खुद्द पाकिस्तानी माध्यमांतच चालली आहे. सरताज यांना काही विशेष अनुभव नसल्याने या बैठकीवर फक्त हिंदुस्थानचा दबदबा राहील अशीही चर्चा पाकिस्तानात सुरू झाली होती. त्यामुळेच हा चर्चेचा डाव विस्कटून जावा आणि कश्मीर प्रश्‍नी गोंधळ निर्माण करून पळ काढावा, अशी ‘नीती’ आखण्यात आली व त्याप्रमाणेच घडले, असे उद्धव यांनी म्हटले आहे.