शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

टीएसपी-कंत्राटदाराने लाटले पैसे

By admin | Updated: June 15, 2016 03:50 IST

टेक्निकल सर्व्हिस प्रोव्हायडर (टीएसपी) व्यक्ती, कंपन्या/फर्म आणि कंत्राटदार, तसेच स्थानिक राजकीय नेत्यांच्या संगनमतातून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याने, ग्रामीण पाणीपुरवठा

- यदु जोशी,  मुंबई

टेक्निकल सर्व्हिस प्रोव्हायडर (टीएसपी) व्यक्ती, कंपन्या/फर्म आणि कंत्राटदार, तसेच स्थानिक राजकीय नेत्यांच्या संगनमतातून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याने, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा पार बोजवारा उडाला आहे. ग्रामसभेने निवडलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा समित्यांना कोणतेही तांत्रिक ज्ञान नसल्याने टीएसपींचा सहारा घेतला. प्रकल्पाचा आराखडा तयार करवून घेण्यासाठी त्यांनी या टीएसपींना काम दिले, ते एक गौडबंगाल होते. कंत्राटदार, स्थानिक राजकारण्यांशी साटेलोटे करून त्यांनी योजना तयार केल्या. पाण्याचा उद्भव असलेले ठिकाण जलस्रोतासाठी न सुचविता, लांबचे ठिकाण सुचवायचे म्हणजे, त्यातून जादा पाइपलाइन लागेल आणि खरेदीमध्ये खाबूगिरी करता येईल, असे अनेक प्रकार गेल्या १५ वर्षांत घडले. कंत्राटदारांनी अत्यंत निकृष्ट पाइप वापरले, ते काहीच महिन्यांत फुटले. शिवाय, पाण्याची उचल विहिरींमधून करण्यासाठी निकृष्ट मोटारी खरेदी केल्या. राज्यात कुठे ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा समित्या, कुठे जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, तर कुठे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या योजनांवर डल्ला मारला. अकोला जिल्ह्यातील चिखलगावचा हा मासलेवाईक किस्सा. मोरणा नदीच्या पात्रात विहीर बांधण्याचे मूळ प्रस्तावात होते. ते ठिकाण बदलून विहीर हलविण्यात आली. ती दोन महिन्यांत कोरडीठाक पडली. आता नदी पात्रातून या विहिरीत पाणी आणले जात आहे. योजनेचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देताना ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाल्याची चर्चा आहे. लाखो रुपये खर्चूनही निकृष्ट कामे झाली. पळसोबढे, भेंडगाव, उमरदरी, मोझरी, महागाव, महारखेड, खेर्डा खुर्द, वरखेड देवदरी, कट्यार, दोनवडा या गावांच्या पाणी योजनांना घोटाळ्यांचा फटका बसला. ‘गेल्या १५ वर्षांत जिथे-जिथे पाणीपुरवठा योजना झाल्या, त्या गावांच्या चिठ्ठ्या टाका अन् कोणतीही चिठ्ठी उचलून पाहिले, तर घोटाळाच दिसेल,’ ही अकोला पूर्वचे भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांची प्रतिक्रिया बोलकी होती. ‘लोकमत’कडे तक्रारींचा पाऊसराज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचार ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात समोर आणल्यानंतर, ‘आमच्याही गावात असेच घडले आहे’ असे सांगणारे अनेक फोन आले. नांदेड, लातूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून तर तक्रारींचा पाऊस पडला. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात ४८ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आणि केवळ सहा पूर्ण झाल्या. असा झाला भ्रष्टाचार :  ठिकठिकाणांहून आलेल्या तक्रारींमध्ये, पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षांनी कामे न करता रक्कम लाटली, योजना पूर्ण न करताच ती पूर्ण झाल्याचे दाखविले, निकृष्ट पाइपलाइन वापरली, एकाच कामासाठी दोन हेडमधून पैसे उचलले, पाणीपुरवठा समित्यांऐवजी वैयक्तिक खात्यात पैसे जमा करण्यात आले, अशा एक ना अनेक गैरप्रकारांबद्दल लोक संतापून बोलले.