शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

गीतेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 8, 2014 01:23 IST

राजकारणात राजी- नाराजीचा खेळ सुरू असतो हे खरे असले, तरी ठाकरी घराण्याचा बाजच मुळी वेगळा.

संजय पाठक - नाशिक
राजकारणात राजी- नाराजीचा खेळ सुरू असतो हे खरे असले, तरी ठाकरी घराण्याचा बाजच मुळी वेगळा. नाराज असेल तर राजी करण्याच्या भानगडीत न पडता खुशाल जा असे सांगणा:या ठाकरी शैलीला बाजूला दूर सारून ज्या पद्धतीने राज यांनी पक्षाचे एक शिलेदार आमदार वसंत गिते यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले, ते बघता राज यांची हतबलता आणि त्यामागूनच आलेली अपरिहार्यता अधोरेखित झाली आहे.
    मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले. साहजिकच शिवसेनेला मानणा:या अनेकांना तर राज यांच्यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे  प्रतिबिंब दिसत असते. सेनाप्रमुखांची लकब, हजरजबाबीपणा, मिश्कीलपणा असे अनेक गुण राज यांच्यात आहेत. शिवसेनाप्रमुख म्हणून काम करताना बाळासाहेब ठाकरे यांची संघटना हाताळण्याची एक वेगळीच शैली होती. संघटनेतून बाहेर पडण्याचे धाडस कोणी करत नव्हते आणि 
केले तर शिवसेनास्टाईल धडा शिकवला जाईल या भीतीने पक्षांतर करणारा काही दिवस तरी दडी मारून बसत असे. शिवसेनेची दहशत असतानाचे खोपडे प्रकरण असो अथवा छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यावर झालेले हल्ला प्रकरण असो, अन्य पक्षांपेक्षा ही वेगळीच धाटणी राहिली आहे. कालांतराने हा आक्रमकपणा कमी झाला असला, तरी शिवसेनाप्रमुखांनी पक्ष सोडणा:यांना रोखले मात्र नाही. गेले तर खुशाल जा, असे बजावताना जेथे जाल तेथे तरी प्रामाणिक राहा असे ते आयाराम गयारामांना सांगत. अनेक माजी मंत्र्यांचाही त्यात समावेश होता. परंतु ठाकरे घराण्याचा हाच शिरस्ता अचानक मोडीत निघाला की काय, असा प्रश्न नाशिकमधील आमदार गिते प्रकरणातून निर्माण झाला आहे.
मनसे स्थापन झाल्यापासून राज ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार असलेले वसंत गिते हे नाशिक नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात सर्र्वेसर्वा आहेत. गिते यांनी दिलेला शब्द हाच मनसेत प्रमाण मानला जात होता. असे असताना, गेल्या काही महिन्यांपासून आणि विशेषत: लोकसभा निवडणुकीत गिते यांच्या नेतृत्वाकडे राज यांनी संशयाने पाहिले आणि नंतर घेतले गेलेले निर्णय गिते यांच्या पचनी पडले नाहीत. त्यानंतर गिते यांच्या भाजपा आणि शिवसेनेतील पक्षांतराविषयी चर्चा सुरू झाल्या आणि राज ठाकरे थेट नाशिक सुभ्यावर दाखल झाले. खुद्द राज यांनी गिते यांची नाराजी दूर करण्यासाठी व्यक्तिगत चर्चा केली. त्यातून राज या विषयावर किती गंभीर आहेत, हेच दिसून आले.
गेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाचे पानिपत बघता आणि महायुतीची हवा दिसू लागताच गिते यांनी दिशाबदलाची तयारी केली असेल तर तीही राजकारणाचा एक भाग आहे. म्हणून राज ठाकरे यांनी इतकी अगतिकता दाखवावी, हे काहीसे अनकालनीय आहेच; शिवाय वदलत्या वा:यामुळेच ठाकरे यांची कार्यशैली तर बदलली नाही ना?
 
च्एक नव्हे, दोन नव्हे, तीन तीन आमदार, नाराज वसंत गिते यांची मनधरणी करण्यासाठी थेट राजसाहेबांच्या आदेशावरुन वसंत गितेंच्या निवासस्थानी धावत गेले. त्यांना पुढे घालून सरकारी  विश्रमगृहावर घेऊन आले. बंद दरवाजाआड गुप्त चर्चा झाली. ती सुरु असतानाच खोलीचा दरवाजा उघडून राजसाहेब ताडकन बाहेर पडले. कोणाशीही चकार शब्द न बोलता, गाडीत बसून मुंबईकडे रवानाही झाले. 
च्वसंत गितेंभोवती साहजिकच गराडा पडला.  ‘आपण नाराज नाही’, असे त्यांनी 
सांगूनही टाकले, पण त्यांचे शब्द आणि त्यांची देहबोली यांच्यात कुठेही मेळ मात्र दिसत नव्हता. जेमतेम पंधरा-वीस मिनिटांच्या या नाटय़ाने मनसेत ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याची प्रचिती येऊन गेली. पुढील चर्चेसाठी म्हणो गिते यांना  उद्याच मुंबईत पाचारण केले गेले आहे.