शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाची सत्यप्रत केली जतन!

By admin | Updated: November 26, 2015 03:19 IST

जगभरात आदर्श ठरलेले भारताचे संविधान आणि त्याविषयी असलेले कुतूहल अनेकांसाठी संशोधनाचा विषय आहे. अनेकांकडे पुस्तक रुपाने संविधानाची प्रत असते

राजकुमार जोंधळे, लातूरजगभरात आदर्श ठरलेले भारताचे संविधान आणि त्याविषयी असलेले कुतूहल अनेकांसाठी संशोधनाचा विषय आहे. अनेकांकडे पुस्तक रुपाने संविधानाची प्रत असते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ताक्षरातील देशाच्या संसदेमध्ये जतन करून ठेवलेल्या मूळ संविधानाच्या प्रतीची सत्यप्रत (फोटोकॉपी) मिळवून मुरुड येथील संभाजी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश वाघमारे यांनी ती प्राणपणाने जतन करुन ठेवली आहे.वाघमारे यांनी आपल्याकडेही सत्यप्रत असावी, यासाठी थेट दिल्ली गाठून महत्तप्रयासाने मिळविली. डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या निर्मितीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. बाबासाहेबांनी राज्यघटना स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिली. बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील राज्यघटना म्हणजे जणू इतिहाातील अमूल्य ठेवा. त्यांच्या हस्ताक्षरात साकारलेली राज्यघटना आपल्या देशाच्या संसदेत ठेवण्यात आली आहे. मूळ प्रत आणणे शक्य नाही. परंतु किमान याची सत्यप्रत तरी आणता येईल, या विचाराने ते प्रेरित झाले.त्यांनी गाठीभेटी आणि विविध परवानगी घेण्यास सुरूवात केली. १९७९ मध्ये त्यांनी थेट रामविलास पासवान यांची भेट घेतली. त्यानंतर सर्व सोपस्कर पूर्ण करुन अवघ्या २४ तासांत सत्यप्रत मिळाली. राज्यघटनेचा प्रवासराज्यघटना निर्मितीसाठी २ वर्षे ११ महिने १७ दिवसांचा कालावधी लागला होता. त्यासाठी एकूण ११ अधिवेशने झाली. त्यात ७ हजार ७३५ सूचना आल्या. २ हजार ४७३ सूचनांवर प्रत्यक्ष सभागृहामध्ये चर्चा करण्यात आली. ११ अधिवेशनांपैकी ६ अधिवेशनात उद्दिष्टांचा ठराव, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, अनुसुचित जाती या समित्यांच्या अहवालावर चर्चा झाली. पाच अधिवेशन घटना मसुदेच्या विचारासाठी खर्च झाले.