शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एसीबी कारवाईत तिपटीने वाढ

By admin | Updated: January 5, 2015 06:28 IST

सरकारी कचेरीत बसलेला फक्त लाच मागतो हा सर्वसामान्यांचा समज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून चुकीचा

मुंबई : सरकारी कचेरीत बसलेला फक्त लाच मागतो हा सर्वसामान्यांचा समज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून चुकीचा ठरू शकेल. सर्वसामान्य ज्याला देव मानतात तो डॉक्टर, न्यायदान करणाऱ्या न्यायालयाचा प्रतिनिधी असलेला वकील, ज्यांच्या जिवावर देशवासीय प्रगतीची स्वप्ने पाहतात ते इंजिनीअर आणि ज्यांच्यामुळे समाज घडतो ते शिक्षक साऱ्यांचेच हात लाचखोरीत बरबटल्याचे धक्कादायक वास्तव एसीबीच्या कारवायांमधून उघड झाले आहे. २०१४मध्ये एसीबीने राज्यातील ३० डॉक्टर, ८७ इंजिनीअर, १२ सरकारी वकील आणि ३० शिक्षकांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.एसीबीने २०१४मध्ये केलेल्या कारवायांचा अभ्यास केल्यास महसूल आणि गृहविभाग सर्वाधिक भ्रष्ट, लाचखोर असल्याचा निष्कर्ष निघू शकेल. दरवर्षी लाचखोरीत या दोन विभागांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगते. २०१४मध्ये लाचखोरीचा किताब गृहविभागाला मागे सारून महसूल विभागाने पटकावला. एसीबीने ३१ डिसेंबरपर्यंत १,२४५ सापळे रचून लाच स्वीकारणारे शासकीय अधिकारी, लोकसेवक अशा एकूण १,६८१ जणांना गजाआड केले. तर बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी ८९ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अन्य भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये १२१ जणांवर कारवाई करण्यात आली.बेहिशोबी मालमत्तांची एकूण ४८ प्रकरणे एसीबीने हाताळली. त्यात ८९ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यातले ४६ सरकारी नोकर असून, ३७ जण पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतले वरिष्ठ अधिकारी आहेत. दुसरे वैशिष्ट्य हे की २०१४मध्ये एसीबीचे सापळे २०१३च्या तुलनेत अडीचपटीने जास्त रचले, बेहिशोबी मालमत्ता गोळा करणाऱ्यांविरोधातील कारवाई तिप्पट तर आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये चौपट कारवाई झाली. एसीबीची जबाबदारी प्रवीण दीक्षित यांनी स्वीकारल्यापासून ही यंत्रणा आक्रमक बनली. मनुष्यबळाची चिंता न करता राज्यातल्या जनतेला लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार करण्याची हिंमत दीक्षित यांच्या व्यूहरचनेने मिळवून दिली. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणे, फोन किंवा एसएमएसवरून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, तक्रारदार-साक्षीदारांना सुरक्षित ठेवणे, जनजागृती आणि महत्त्वाचे म्हणजे तक्रार मिळताच ताबडतोब कारवाई करणे, या आणि अशा अनेक योजनांनी दीक्षित यांनी सर्वसामान्यांत विश्वास निर्माण केला.आकडे वाढले म्हणजे भ्रष्टाचार वाढला असे नाही. भ्रष्टाचार कालही होता, आजही आहे. तक्रारी वाढल्या. पुढे येऊन तक्रार देण्याची हिंमत वाढली. भविष्यातही सर्वसामान्यांनी लाचखोरांविरोधात असेच निर्भीडपणे पुढे यावे, असे आवाहन दीक्षित नेहमी करतात. (प्रतिनिधी)