शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

एसीबी कारवाईत तिपटीने वाढ

By admin | Updated: January 5, 2015 06:28 IST

सरकारी कचेरीत बसलेला फक्त लाच मागतो हा सर्वसामान्यांचा समज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून चुकीचा

मुंबई : सरकारी कचेरीत बसलेला फक्त लाच मागतो हा सर्वसामान्यांचा समज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून चुकीचा ठरू शकेल. सर्वसामान्य ज्याला देव मानतात तो डॉक्टर, न्यायदान करणाऱ्या न्यायालयाचा प्रतिनिधी असलेला वकील, ज्यांच्या जिवावर देशवासीय प्रगतीची स्वप्ने पाहतात ते इंजिनीअर आणि ज्यांच्यामुळे समाज घडतो ते शिक्षक साऱ्यांचेच हात लाचखोरीत बरबटल्याचे धक्कादायक वास्तव एसीबीच्या कारवायांमधून उघड झाले आहे. २०१४मध्ये एसीबीने राज्यातील ३० डॉक्टर, ८७ इंजिनीअर, १२ सरकारी वकील आणि ३० शिक्षकांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.एसीबीने २०१४मध्ये केलेल्या कारवायांचा अभ्यास केल्यास महसूल आणि गृहविभाग सर्वाधिक भ्रष्ट, लाचखोर असल्याचा निष्कर्ष निघू शकेल. दरवर्षी लाचखोरीत या दोन विभागांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगते. २०१४मध्ये लाचखोरीचा किताब गृहविभागाला मागे सारून महसूल विभागाने पटकावला. एसीबीने ३१ डिसेंबरपर्यंत १,२४५ सापळे रचून लाच स्वीकारणारे शासकीय अधिकारी, लोकसेवक अशा एकूण १,६८१ जणांना गजाआड केले. तर बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी ८९ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अन्य भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये १२१ जणांवर कारवाई करण्यात आली.बेहिशोबी मालमत्तांची एकूण ४८ प्रकरणे एसीबीने हाताळली. त्यात ८९ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यातले ४६ सरकारी नोकर असून, ३७ जण पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतले वरिष्ठ अधिकारी आहेत. दुसरे वैशिष्ट्य हे की २०१४मध्ये एसीबीचे सापळे २०१३च्या तुलनेत अडीचपटीने जास्त रचले, बेहिशोबी मालमत्ता गोळा करणाऱ्यांविरोधातील कारवाई तिप्पट तर आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये चौपट कारवाई झाली. एसीबीची जबाबदारी प्रवीण दीक्षित यांनी स्वीकारल्यापासून ही यंत्रणा आक्रमक बनली. मनुष्यबळाची चिंता न करता राज्यातल्या जनतेला लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार करण्याची हिंमत दीक्षित यांच्या व्यूहरचनेने मिळवून दिली. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणे, फोन किंवा एसएमएसवरून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, तक्रारदार-साक्षीदारांना सुरक्षित ठेवणे, जनजागृती आणि महत्त्वाचे म्हणजे तक्रार मिळताच ताबडतोब कारवाई करणे, या आणि अशा अनेक योजनांनी दीक्षित यांनी सर्वसामान्यांत विश्वास निर्माण केला.आकडे वाढले म्हणजे भ्रष्टाचार वाढला असे नाही. भ्रष्टाचार कालही होता, आजही आहे. तक्रारी वाढल्या. पुढे येऊन तक्रार देण्याची हिंमत वाढली. भविष्यातही सर्वसामान्यांनी लाचखोरांविरोधात असेच निर्भीडपणे पुढे यावे, असे आवाहन दीक्षित नेहमी करतात. (प्रतिनिधी)