शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

एसीबी कारवाईत तिपटीने वाढ

By admin | Updated: January 5, 2015 06:28 IST

सरकारी कचेरीत बसलेला फक्त लाच मागतो हा सर्वसामान्यांचा समज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून चुकीचा

मुंबई : सरकारी कचेरीत बसलेला फक्त लाच मागतो हा सर्वसामान्यांचा समज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून चुकीचा ठरू शकेल. सर्वसामान्य ज्याला देव मानतात तो डॉक्टर, न्यायदान करणाऱ्या न्यायालयाचा प्रतिनिधी असलेला वकील, ज्यांच्या जिवावर देशवासीय प्रगतीची स्वप्ने पाहतात ते इंजिनीअर आणि ज्यांच्यामुळे समाज घडतो ते शिक्षक साऱ्यांचेच हात लाचखोरीत बरबटल्याचे धक्कादायक वास्तव एसीबीच्या कारवायांमधून उघड झाले आहे. २०१४मध्ये एसीबीने राज्यातील ३० डॉक्टर, ८७ इंजिनीअर, १२ सरकारी वकील आणि ३० शिक्षकांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.एसीबीने २०१४मध्ये केलेल्या कारवायांचा अभ्यास केल्यास महसूल आणि गृहविभाग सर्वाधिक भ्रष्ट, लाचखोर असल्याचा निष्कर्ष निघू शकेल. दरवर्षी लाचखोरीत या दोन विभागांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगते. २०१४मध्ये लाचखोरीचा किताब गृहविभागाला मागे सारून महसूल विभागाने पटकावला. एसीबीने ३१ डिसेंबरपर्यंत १,२४५ सापळे रचून लाच स्वीकारणारे शासकीय अधिकारी, लोकसेवक अशा एकूण १,६८१ जणांना गजाआड केले. तर बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी ८९ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अन्य भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये १२१ जणांवर कारवाई करण्यात आली.बेहिशोबी मालमत्तांची एकूण ४८ प्रकरणे एसीबीने हाताळली. त्यात ८९ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यातले ४६ सरकारी नोकर असून, ३७ जण पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतले वरिष्ठ अधिकारी आहेत. दुसरे वैशिष्ट्य हे की २०१४मध्ये एसीबीचे सापळे २०१३च्या तुलनेत अडीचपटीने जास्त रचले, बेहिशोबी मालमत्ता गोळा करणाऱ्यांविरोधातील कारवाई तिप्पट तर आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये चौपट कारवाई झाली. एसीबीची जबाबदारी प्रवीण दीक्षित यांनी स्वीकारल्यापासून ही यंत्रणा आक्रमक बनली. मनुष्यबळाची चिंता न करता राज्यातल्या जनतेला लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार करण्याची हिंमत दीक्षित यांच्या व्यूहरचनेने मिळवून दिली. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणे, फोन किंवा एसएमएसवरून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, तक्रारदार-साक्षीदारांना सुरक्षित ठेवणे, जनजागृती आणि महत्त्वाचे म्हणजे तक्रार मिळताच ताबडतोब कारवाई करणे, या आणि अशा अनेक योजनांनी दीक्षित यांनी सर्वसामान्यांत विश्वास निर्माण केला.आकडे वाढले म्हणजे भ्रष्टाचार वाढला असे नाही. भ्रष्टाचार कालही होता, आजही आहे. तक्रारी वाढल्या. पुढे येऊन तक्रार देण्याची हिंमत वाढली. भविष्यातही सर्वसामान्यांनी लाचखोरांविरोधात असेच निर्भीडपणे पुढे यावे, असे आवाहन दीक्षित नेहमी करतात. (प्रतिनिधी)