शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी प्रयत्न

By admin | Updated: October 1, 2016 03:31 IST

अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडलेल्या व पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय जवानाच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

नवी दिल्ली/धुळे/जळगाव : अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडलेल्या व पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय जवानाच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुळचा धुळे जिल्ह्यातील व ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये असलेला जवान चंदू बाबुलाल चव्हाण यांच्या सुटकेसाठी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची दिल्लीत भेट घेतली. चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याचे सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. चव्हाण यांची आजी लिलाबाई चिंधू पाटील यांना जामनगर येथे हे कळताच हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)पाककडे पाठपुरावा : चंदू यांच्या सुटकेचा मुद्दा पाकिस्तानपुढे मांडण्यात येईल. सैन्य अभियानाच्या महासंचालकांनी ही माहिती हॉटलाइनद्वारे पाकिस्तानला दिली आहे. पाकमध्ये करण्यात आलेला हल्ला आणि या जवानाने चुकून पार केलेली नियंत्रण रेषा यांचा काहीही संबंध नाही, अशी माहिती सैन्य दलाने दिली आहे.चव्हाण यांना भारतात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. भारत वा पाकचे जवान नियंत्रण रेखा ओलांडणे या घटना नित्याच्याच आहेत. असे प्रकार अनावधानाने घडत असतात़ त्याबाबत दोन्ही देशांच्या लष्कराकडून एकमेकांना माहिती दिली जाते. कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर, दोन्ही देशांतील प्रत्यार्पण करारानुसार जवानांना देशात परत पाठविले जाते. साधारणपणे २० दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होते. - डॉ. सुभाष भामरे, संरक्षण राज्यमंत्री