शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

आदिवासींना हवे स्वतंत्र राज्य - पिचड

By admin | Updated: February 14, 2015 04:10 IST

देशभरात अठरा कोटी संख्या असलेला आदिवासी समाज आजही विकासापासून वंचित असून, स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विकास होणे शक्य नाही़

नाशिक : देशभरात अठरा कोटी संख्या असलेला आदिवासी समाज आजही विकासापासून वंचित असून, स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विकास होणे शक्य नाही़ केंद्र सरकारने आदिवासींसाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्याची मागणी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी शुक्रवारी येथे केली़ अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे कालिदास कलामंदिरात आयोजित प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते़ थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांना भारतरत्न देण्याची तसेच स्वतंत्र राज्याची निर्मिती न केल्यास देशभर आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला़व्यासपीठावर आमदार वैभव पिचड, राष्ट्रीय महिला अध्यक्ष ऊर्मीताई मार्को, मणिरामजी मडवी, नामदेव मेश्राम, आऱ यू़ केराम, धनश्याम मडवी, दशरथ मडवी, श्याम वरखडे, सूर्यकांत उईके, नारायण सिडम आदि उपस्थित होते़ पिचड म्हणाले की, आदिवासी ही महान संस्कृती असून, तेच या देशाचे मूळ आहेत़ देशाच्या स्वातंत्र्यासाठी उठाव करून बलिदान देणारा हा समाज असून, दुर्दैवाने या समाजाचा इतिहास लिहिणारे कुणी नव्हते़ या समाजावर सतत अन्याय-अत्याचार होत गेले तसेच त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले़ आश्रमशाळा, वसतिगृहे यातील विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसून याविरोधात लढाई करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येण्याची आवश्यकता आहे़ मंत्रिपदाच्या काळात पेसा कायदा मंजूर केला; मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने आंदोलनाची वेळ आली आहे़ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या वक्तव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला़ तसेच या आरक्षणाबाबत चुकीचा निर्णय घेतल्यास मुंबईकडे जाणारे पाणी अडविण्याचा इशारा त्यांनी दिला़ (प्रतिनिधी)