शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ते दिल्ली प्रवास १६ तासांवरुन १२ तासांंत होणार; ‘टाल्गो’ ट्रेनची तीन महिन्यात चाचणी

By admin | Updated: April 30, 2016 04:44 IST

मुंबई ते दिल्ली दरम्यानचा रेल्वे प्रवास येत्या काही काळात १६ तासांवरुन १२ तासांत होणार आहे.

मुंबई : मुंबई ते दिल्ली दरम्यानचा रेल्वे प्रवास येत्या काही काळात १६ तासांवरुन १२ तासांत होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या दोन्ही मार्गादरम्यान प्रवासअंतर कमी करण्यासाठी वेगवान आणि सर्व सुविधांनी युक्त अशी ‘टाल्गो’ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येत्या तीन महिन्यात मुंबई ते दिल्ली मार्गावर टाल्गो ट्रेनच्या चाचण्या केल्या जातील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. मुंबई ते अहमदाबादबरोबरच मुंबई ते दिल्ली दरम्यानही मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे प्रवास अंतर कमी करण्यासाठी बुलेट ट्रेनचे नियोजन केले जात असतानाच मुंबई ते दिल्ली दरम्यानचे प्रवास अंतरही कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुंबई ते दिल्ली दरम्यान वेगवान टाल्गो ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हेच अंतर कापण्यासाठी राजधानी एक्सप्रेसला १६ तास लागतात. टाल्गो ट्रेनमुळे हाच प्रवास बारा तासांवर येऊन पोहोचेल,अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. याआधी टाल्गो ट्रेनच्या दोन चाचण्या अन्य मार्गांवरही केल्या जाणार आहेत. यात मुरादाबाद ते बरेली आणि मथुरा ते पलवल या दोन्ही मार्गांवर ताशी १00 ते १५0 च्या वेगाने चाचणी केली जाईल. त्यानतंतर मात्र मुंबई ते दिल्ली मार्गावर साधारपणे ताशी २00 च्या वेगाने चाचणी केली जाणार आहे. ही ट्रेन नऊ डब्यांची असेल. स्पेनमधील बार्सिलोनातील कंपनीकडून टाल्गो ट्रेन भारतीय रेल्वेला उपलब्ध होईल. सुरुवातीला या ट्रेनची कोणतीही किंमत भारतीय रेल्वेला मोजावी लागणार नाही आणि चाचण्याही या विनाशुल्कच होतील.>अशी आहेत वैशिष्ट्येनऊ डब्यांची ट्रेनताशी २00 ते २२0 चा वेगअ‍ॅल्युमिनियमचे डबेअत्यंत कमी प्रमाणात व्हायब्रेट होईल. ३0 टक्के कमी ऊर्जा या ट्रेनला लागेल. आगीपासून बचाव होईल.