शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मोबाईल न वापरता येणे मानसिक त्रासच - ग्राहक मंच

By admin | Updated: July 10, 2015 02:10 IST

मोठ्या हौसेने २२ हजार ८०० रुपये मोजून विकत आणलेला मोबाईल एकही दिवस वापरता न आलेल्या ग्राहकाला ग्राहक मंचात न्याय मिळाला.

विक्रेत्यास दणकापुणे : मोठ्या हौसेने २२ हजार ८०० रुपये मोजून विकत आणलेला मोबाईल एकही दिवस वापरता न आलेल्या ग्राहकाला ग्राहक मंचात न्याय मिळाला. मंचाने विक्री केलेल्या मोबाईल शॉप व सर्व्हिस सेंटरला मोबाईलची मूळ किंमत २२ हजार ८०० रुपये देण्याचा आदेश दिला तसेच एकही दिवस मोबाईल वापरता आला नाही यामुळे साहजिकच मानसिक त्रास झाल्याचे नमूद करीत यापोटी ५ हजार व तक्रारीचा खर्च म्हणून २ हजार, असे एकूण २९ हजार ८०० रुपये देण्याचा आदेश मंचाने दिला आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर व क्षितिजा कुलकर्णी यांच्या मंचाने निकाल दिला.या प्रकरणी निखिल विजयकुमार जाधव (रा. बोपोडी) यांनी तक्रार दिली आहे. आराध्या एंटरप्रायझेस (एरंडवणा) हे सर्व्हिस सेंटर व केन्शा मोबाईल शॉप (टिळक स्मारक मंदिरासमोर) या विक्रेत्याच्या विरुद्ध तक्रार दिली होती. विक्रेत्यांनी मोबाईल दुरुस्तही करून दिला नाही किंवा नवीन मोबाईलही दिला नाही. ग्राहक मंचाने यावर नुकसानभरपाईचा आदेश दिला. मोबाईल बदलून दिला नाही> जाधव यांनी केन्शा मोबाईल शॉपमधून २२ हजार ८०० रूपये देऊन मोबाईल विकत घेतला. मात्र, खरेदी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोबाईल बिघडला. त्यामुळे त्यांनी विक्रेत्याकडे तक्रार केली, तेव्हा त्यांनी आराध्या एंटरप्रायझेस येथून मोबाईल बदलून मिळेल, असे सांगितले. > त्या वेळी एंटरप्रायझेसने मोबाईल बदलून न देता तात्पुरती दुरुस्ती केली व मोबाईल परत बिघडल्यास बदलून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याच दिवशी मोबाईल पुन्हा नादुरूस्त झाला तो त्यांनी मोबाईल अ‍ॅक्सेसरीसहित एंटरप्रायझेसकडे नेऊन दिला. त्यांनी मोबाईल मिळाल्याचे पत्रही तक्रारदारांना दिले; मात्र मोबाईल बदलून दिला नाही. त्यामुळे तक्रारदाराने नवा मोबाईल मिळावा म्हणून ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.