शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांचे पंचनामे पारदर्शकपणो व्हावे

By admin | Updated: December 14, 2014 01:45 IST

जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे शेतक:यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांना तातडीने सरकारी मदत देण्याची गरज आहे.

नाशिक : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे शेतक:यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांना तातडीने सरकारी मदत देण्याची गरज आहे. मात्र मदत देताना नुकसानग्रस्त बागांचे पारदर्शकपणो पंचनामे व्हायला हवे, अन्यथा गरजूंर्पयत मदत पोहोचणार नसून आलेला पैसा नेहमीप्रमाणो इतरांच्याच खिशात जाईल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. 
दोन दिवस नाशिक दौ:यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शहरातील गोदापार्कसह शिवाजी उद्यान व चिल्ड्रेन पार्कला भेट दिली. या वेळी गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतक:यांचे झालेल्या नुकसानीबाबत विचारले असता, त्यांनी सरकारी यंत्रणोवर निशाणा साधत पंचनामे पारदर्शकपणो होण्याची गरज असल्याचे सांगितले. अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतक:यांना सरकारी स्तरावरून मदत दिली जाते. मात्र थातूर-मातूर नुकसान दाखवून पंचनामे केले जात असल्याने गरजू शेतक:यांर्पयत मदत पोहोचत नाही. या वेळेसदेखील हा कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. कदाचित सरकारकडून नुकसानग्रस्त शेतक:यांसाठी कोटय़वधी रुपयांची पॅकेजेस् जाहीर केली जातील, मात्र मदत त्यांच्यार्पयत पोहोचेलच याबाबत साशंकता आहे. नव्या सरकारची आता ख:या अर्थाने परीक्षा असून, त्यांच्या भूमिकेकडे आपले लक्ष असेल, असेही राज यांनी स्पष्ट केले. 
 
वेधशाळेचा अंदाजच चुकीचा
आपल्याकडील वेधशाळेने वर्तविलेला अंदाज कधीच खरा ठरत नाही. परदेशातील वेधशाळा आठ ते दहा दिवस अगोदरच हवामानातील बदलांबाबतची अचूक माहिती देतात. मात्र आपल्या वेधशाळांमध्ये नेमके कुठल्या पद्धतीने काम केले जाते याबाबत मला नेहमीच प्रश्न पडतो. त्यामुळे अगोदर वेधशाळा सक्षम करा जेणोकरून शेतक:यांचे होणारे नुकसान टाळता येईल, असे ते म्हणाले.