शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

परंपरागत शेतीला पर्याय आवश्यक

By admin | Updated: November 26, 2015 03:25 IST

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे जगणे उन्नत होणार नाही. शहराकडे येणारे लोंढे थांबविण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे.

यवतमाळ : ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे जगणे उन्नत होणार नाही. शहराकडे येणारे लोंढे थांबविण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योग उभारणी होईल, पण परंपरागत शेतीलाही पर्याय शोधणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या १८व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार प्रफुल्ल पटेल, लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा आदी उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, बाबूजींनी आणि देशातील तमाम स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी स्वातंत्र्यापूर्वी सुराज्याचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न अद्याप आपण पूर्ण करू शकलो नाही. सुखी, संपन्न, समृद्ध आणि शक्तिशाली भारताचे पुन:निर्माण करणे हीच बाबूजींना खरी श्रद्धांजली ठरेल. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आपल्या अर्थव्यवस्थेत बदल करावा लागेल. त्यासाठी परंपरागत शेतीचा त्याग करून तंत्रज्ञानावर आधारित नवेनवे उपाय शोधणे आवश्यक झाले आहे. ग्रामीण भागात उद्योगनिर्मितीसह वीज, पाणी, रस्ते, आरोग्यसेवा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी सरकार काम करते आहे, असे गडकरी म्हणाले.खा. पटेल म्हणाले, बाबूजींनी सातत्याने देशाच्या प्रगतीचाच विचार केला आहे. लोकमतच्या माध्यमातून पत्रकारितेला प्रारंभ करून त्यांनी जनप्रबोधन केले. आम्ही राजकीय क्षेत्रात असलो, तरी आमच्यासाठी काही आदर्श व्यक्तिमत्त्वे असतात. त्यात बाबूजी माझ्यासाठी आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. आधुनिक महाराष्ट्रात बाबूजींचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले गेले आहे. खा. दर्डा यांनी आठवणींना उजाळा देत विदर्भ विकासासंदर्भात आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, बाबूजींनी विदर्भाच्या उद्योगवाढीसाठी आणि वीजनिर्मितीसाठी मोठे आणि महत्त्वाचे योगदान दिले आहे. राजकारणात विरोध होतोच, पण विकास थांबायला नको, असे त्यांचे मत होते. बाबूजींनी मला एक बाब सांगितलेली आठवते, एखाद्या कामाचे विरोधक राहू शकतात, पण ते विरोधकच असतात शत्रू नाही, हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळेच विदर्भाच्या विकासासाठी पक्षीय राजकारण कधीच विदर्भात आडवे येत नाही. गडकरी हे स्पष्टवक्ते आहेत. ते विकासपुरुष आहेत. यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा विमानतळाच्या विकासासाठी नितीन गडकरी यांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, खासदार भावना गवळी आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबूजींनी पुत्रवत प्रेम केलेबाबूजींनी विदर्भाच्या विकासासाठी केलेले कार्य कुणीच विसरू शकत नाही. ते उद्योगमंत्री असताना त्यांनी विदर्भ आणि महाराष्ट्राच्या विकासाचा प्रयत्न केला. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी केलेले काम लोकमतच्या लोकप्रियतेतून सिद्ध होते. मृदुभाषी बाबूजींनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले आणि मार्गदर्शनही केले, असे नितीन गडकरी या वेळी म्हणाले.