शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

व्यापारी रिंगणात

By admin | Updated: January 17, 2017 04:19 IST

भाजपा व शिवसेना या सत्ताधारी पक्षांना इंगा शिकवण्याकरिता व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी पालिकेत पाठवण्याकरिता काही जागा लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला

ठाणे : लोकसभा व विधानसभा निवडणुकांत ‘मोदीनामा’चा गजर केलेला ठाण्यातील व्यापारीवर्ग स्टेशन परिसर व अन्यत्र महापालिकेने केलेल्या तोड कारवाईमुळे तसेच रस्ते रुंदीकरणानंतर फेरीवाल्यांनी त्या जागेचा ताबा घेऊनही राजकीय पक्षांनी मिठाची गुळणी घेतल्याने नाराज झाला आहे. भाजपा व शिवसेना या सत्ताधारी पक्षांना इंगा शिकवण्याकरिता व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी पालिकेत पाठवण्याकरिता काही जागा लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.ठाणे महापालिकेने स्टेशन परिसर ते जांभळीनाका, घोडबंदर, कळवा आदी भागांत स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत रस्ता रुंदीकरण केले. त्यानंतर, स्टेशन परिसर तर ‘ना-फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले. परंतु, पुन्हा या भागात फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी वारंवार पालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, केवळ थातूरमातूर कारवाई केली. सत्ताधारी पक्षाने याबाबतीत मदत करण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून व्यापाऱ्यांची निराशा झाली. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला साथ दिली, म्हणून शिवसेनेने व्यापाऱ्यांना मदत नाकारली. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी पुन्हा भाजपाकडे धाव घेतली. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता सुरू असलेल्या कारवाईत भाजपाच्या नेत्यांनी हस्तक्षेप करणे टाळले. त्यातच पालिकेने आणखी पाच रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे आणला. या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये विरोध झाला. हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. त्यानंतर शिवसेना, भाजपाच्या वतीने श्रेय लाटणारे बॅनर स्टेशन परिसर आणि नौपाडा परिसरात लावले होते. परंतु, त्यानंतर पालिका प्रशासनाने या दोन्ही सत्ताधारी पक्षांचा विरोध धाब्यावर बसवत या रस्त्यांचे रुंदीकरण होणारच, असा पवित्रा घेतल्याने व्यापारी हवालदिल झाले. एकीकडे पालिकेचा बुलडोझर लक्षावधी रुपये खर्च करून बांधलेली दुकाने जमीनदोस्त करीत आहे. दुसरीकडे दुकाने पाडल्याने रुंदीकरण झालेले रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले आहेत आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर व्यापारात मंदी आली आहे. अशा तिहेरी संकटातून सुटका होत नसल्याने व्यापारीवर्ग कमालीचा नाराज झाला आहे. त्यामुळे आता आमच्या समस्या आम्हीच सोडवू, असा नारा देत व्यापारी एकत्र आले आहेत. (प्रतिनिधी)>व्यापाऱ्यांच्या समस्या सुटत नसल्यानेच आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. - मितीश शहा, व्यापारी >नौपाडा, घोडबंदरला पसंतीज्या विभागात व्यापारीवर्ग अधिक आहे, असे ठाणे स्टेशन, नौपाडा, गोखले रोड, घोडबंदर, मानपाडा, कळवा आदी भागांत उमेदवार उभे करण्याचा निर्णय व्यापारीवर्गाने घेतला आहे. यासंदर्भातील बैठक सोमवारी रात्री येथील एका हॉटेलमध्ये झाली. या बैठकीत महापालिकेची निवडणूक लढवण्याच्या मुद्यावर व्यापाऱ्यांचे एकमत झाले.