शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

व्यापारी-फेरीवाले संघर्ष पेटला

By admin | Updated: October 18, 2016 03:33 IST

रस्त्यांवर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची मुजोरी वाढत असून त्यातूनच सोमवारी स्टेशन परिसरात व्यापारी-फेरीवाल्यांत संघर्ष झडला.

ठाणे : रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली एकीकडे दुकाने तोडली जात असताना त्याच रस्त्यांवर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची मुजोरी वाढत असून त्यातूनच सोमवारी स्टेशन परिसरात व्यापारी-फेरीवाल्यांत संघर्ष झडला. बेकायदा फेरीवाल्याने दुकानदाराला धमकी दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच आक्रमक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत पोलीस आणि पालिका प्रशासनाचा निषेध केला. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होताच त्यांनीही प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढला. फेरीवाल्यांवर कारावईसाठी व्यापाऱ्यांनी पालिकेला अवघ्या दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्याला फेरीवाल्यांनी विरोध केला आहे. परिणामी, ऐन दिवाळीच्या तोंडावर, खरेदीच्या मोसमात व्यापाऱ्यांमधील खदखद यानिमित्ताने बाहेर आली. ठाण्याच्या बाजारपेठेत दुकानाबाहेर फेरीवाल्याने परस्पर ठेला मांडला. दुकानदाराने आक्षेप घेत त्याला हटकले. त्यातून झालेल्या वादातून फेरीवाल्याने या दुकानदाराला धमकावले. बाजारपेठेत हे वृत्त झपाट्याने पसरले आणि व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याने व्यापारी नाराज आहेत. त्यातच थेट दुकानाबाहेर ठेला मांडून दुकानात येण्याचा रस्ता बंद करणाऱ्या फेरीवाल्याला हटकताच दुकानदाराला धमकावण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आक्रमक होत बाजारपेठेतील सर्वच फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी लावून धरली. महापालिकेच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. त्यामुळे बाजारपेठेत फेरीवाला विरुद्ध व्यापारी असा संघर्ष उभा ठाकला. महापौर संजय मोरे, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी घटनास्थळी जाऊन सर्वांची समजूत काढली. त्यावेळी व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांवर कारवाईसाठी महापालिकेला दोन दिवसांचा अवधी दिला, तर फेरीवाल्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीची मागणी केली. महापौर आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने उघडली. त्यानंतर फेरीवाले आक्रमक झाले आणि त्यांनी नौपाडा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढला. रूंद रस्त्यांचा वाहतूक सुरळीत होण्यास उपयोग होत नाही. उलट फेरीवाले त्या जागेचा बेकायदा ताबा घेतात. त्यांना राजकीय संरक्षण मिळते. पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांचा धंदा सुरू राहतो. मात्र दुकानदार भरडले जातात. त्यामुळे ठाण्यातीलच नव्हे, तर कल्याण आणि डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी रस्ता रूंदीकरणाविरोधात आवाज उठवला. >फेरीवाला धोरण वादात; सेनेचीही कोंडीकेवळ ठाणेच नव्हे, तर कल्याण-डोंबिवलीतही व्यापारी-फेरीवाले संघर्ष सुरू आहे. त्यात मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेत पालिकेला लक्ष्य केल्याने भाजपाची कोंडी झाली होती. ठाण्यातही रस्ता रूंदीकरणात दुकाने तोडण्याची कारवाई पूर्ण झाल्यावर भाजपाने व्यापाऱ्यांची बाजू उचलून धरली. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली होती. व्यापाऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे पावसाळ््यानंतर सुरू होणारा ठाणे पालिकेचा रस्ता रूंदीकरणाचा पुढील टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे, तर डोंबिवलीतील रस्ता रूंदीकरण वादात सापडले आहे. पालिका व्यापाऱ्यांना वेठीला धरते, मात्र फेरीवाल्यांना झुकते माप देते असा व्यापाऱ्यांचा आक्षेप आहे; तर फेरीवाला झोन ठरवण्यात व्यापारी खोडा घालतात, असा फेरीवाल्यांचा आरोप आहे.