शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

बेस्ट संकटावरील उताराच अडचणीत

By admin | Updated: April 4, 2017 03:01 IST

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट उपक्रमाला महापालिकेने हात देण्याचे कबूल केल्यामुळे कृती आराखडा प्रशासनाने तयार केला

मुंबई : आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट उपक्रमाला महापालिकेने हात देण्याचे कबूल केल्यामुळे कृती आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. मात्र यामध्ये महापालिकेने सुचविलेली स्वेच्छानिृवत्ती, बसगाड्या कमी करणे आणि बेस्ट भाडेवाढ अशा जालीम उपायांचा समावेश आहे. त्यामुळे हा आराखडा अमलात येण्यापूर्वीच अडचणीत येणार आहे.कोट्यवधी रुपयांच्या तुटीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला टाळे लागण्याची वेळ आली आहे. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बेस्टने अखेर महापालिकेपुढे हात पसरले आहेत. पालिका प्रशासनानेही या सार्वजनिक उपक्रमाच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे. मात्र आर्थिक मदतीपूर्वी यावर बेस्टकडून अहवाल मागविण्यात आला होता. हा अहवाल तयार असून गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.यामध्ये बसभाड्यात दोन ते चार रुपयांमध्ये वाढ, पांढरा हत्ती ठरणाऱ्या वातानुकूलित २८४ बसगाड्या बंद करणे, वाहनचालक व वाहक वगळता नोकर भरती बंद आणि स्वेच्छा अथवा सक्तीची निवृत्ती असे उपाय या अहवालातून पुढे आले आहेत. मात्र कामगार कपातीला कामगार संघटनांकडून तीव्र विरोध होणार हे निश्चित आहे. तसेच भाडेवाढ बेस्टलाच घातक ठरू शकते. त्यामुळे या शिफारशींवर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)वातानुकूलित बसगाड्या बंदवातानुकूलित बसगाड्या बेस्टसाठी केवळ पांढरा हत्तीच ठरल्या आहेत. या बसगाड्यांच्या उत्पन्नापेक्षा त्यावरील खर्चच अधिक आहे. दरवर्षी या सेवेतून बेस्ट उपक्रमाचे ८२ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. ही बाब वारंवार निदर्शनास आणूनही केवळ प्रतिष्ठेसाठी बेस्टने या बसगाड्या बंद केल्या नाहीत. यामुळे आर्थिक तूट वाढत गेली. आता या २८४ वातानुकूलित बसगाड्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे.भाडेवाढ म्हणजे पायावर धोंडा : बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून पाच ते सात वर्षांपूर्वी ४२ लाख प्रवासी प्रवास करत होते. ही संख्या आता २९ लाखांवर आली आहे. दोन वर्षांपूर्वीच बेस्ट उपक्रमाने तीन वेळा भाडेवाढ केली होती. त्यातच मेट्रो रेल्वेचे जाळे वाढत आहे. शेअर रिक्षा-टॅक्सीचे आव्हान, ओला व उबेरची स्पर्धा यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येवर परिणाम होत आहे. अशात आणखी भाडेवाढ बेस्ट उपक्रमाला मुंबईकरांपासून तोडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. सध्या तिकिटांचा किमान दर आठ रुपये आहे, तो दहा रुपये करण्याचे प्रस्तावित आहे. वातानुकूलित बसगाड्यांचा सोस सुटत नाहीवातानुकूलित बसगाड्या बंद करण्याचे ठरविले तरी अद्याप या बसगाड्यांचा बेस्टचा सोस काही सुटलेला नाही. त्यामुळे २५ कोटी खर्च करून वातानुकूलित मिनी बसगाड्या खरेदी करणे प्रस्तावित आहे.या वर्षभरात १५८७ कामगार निवृत्त होणार आहेत. मात्र वाहनचालक व वाहक वगळता नोकरभरती करण्यात येणार नाही.