शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

टोमॅटोपाठोपाठ कांद्यानेही रडविले!

By admin | Updated: August 29, 2016 03:31 IST

निकृष्ट बियानांमुळे टोमॅटो हंगाम हातातून गेल्यानंतर आर्थिक गर्तेत सापडलेल्या बळीराजाला कांदापिक तरी वर काढेल, अशा आशेवर बसलेल्या उत्पादकांच्या डोळयात सध्या कांद्याने पाणी आणले आहे.

ओझर / निरगुडसर : निकृष्ट बियानांमुळे टोमॅटो हंगाम हातातून गेल्यानंतर आर्थिक गर्तेत सापडलेल्या बळीराजाला कांदापिक तरी वर काढेल, अशा आशेवर बसलेल्या उत्पादकांच्या डोळयात सध्या कांद्याने पाणी आणले आहे. किलोला ५ ते ७ रुपये इतका कमी बाजारभाव मिळत असल्याने त्यातून भांडवलही निघत नसल्याने आता कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात कांदापिक मोठ्या प्रमाणावर घेतले होते़ त्यामध्ये आंबेगाव तालुक्यासह शिरूर, खेड, जुन्नर या तालुक्यांचाही समावेश आहे़ कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी ३५ ते ४० हजार रुपये एकरी खर्च करून शेतात कांदापिक घेतले होते़ पोषक हवामानामुळे उत्पादनही चांगल्या प्रमाणात झाले़ त्या वेळी कांद्याला ७० ते ८० रुपये दहा किलोसाठी बाजारभाव मिळत होता़ हा बाजारभाव केलेल्या खर्चाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने कांदाचाळी बांधून कांद्याची साठवणूक केली़ लाखो रुपये खर्च करून कांदाचाळी बांधल्या, कांद्याचे भांडवल अधिक कांदाचाळींचा खर्च, मंजुरी सर्व खर्च अंगावर पडून आहे. शासनाकडून मिळणाऱ्या कांदाचाळींचे अनुदानदेखील मिळालेले नाही़ त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे़ कांदापिकासाठी बँका, सोसायट्या यांचे कर्ज काढून केलेला भांडवली खर्चदेखील सध्याच्या दरात वसूल होत नाही. पाच महिने बराकीत कांदा साठवून ठेवला. त्यामधील बराचसा कांदा सडला, वजन घट झाली. तरीही कांद्याचे दर वाढतच नसल्यामुळे खर्च केलेले भांडवलदेखील सध्या वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा अधिकच वाढला आहे. उन्हाळी हंगामात टोमॅटोची पिके घेतली. परंतु या पिकाला करपा, बोकड्या या रोगाच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटोचा भांडवली खर्चदेखील वसूल झाला नाही. (प्रतिनिधी)भाव आणखी कमी होणारया वर्षी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता धूसर असल्याची शक्यता ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडतदार प्रदीप मुरादे, धनेश संचेती (जुन्नर) यांनी सांगितले. साठवणगृहात सडत चाललेला कांदा, तसेच भविष्यात कांद्याचे दर वाढणार नाहीत, या शक्यतेने भीतीपोटी जुन्नर, ओतूर, तसेच ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर अधिक ढासळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांच्या अडतीचा तिढा निर्माण केल्यामुळे अडतदार व्यापारी व शेतमाल खरेदीदार व्यापारी यांच्यामधील साट्यालोट्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री कचरामोल भावात होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची खंत पिंपळगाव सिद्धनाथ येथील प्रगतिशील शेतकरी संदेश खंडागळे, संतोष खंडागळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.