शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

टोमॅटोपाठोपाठ कांद्यानेही रडविले!

By admin | Updated: August 29, 2016 03:31 IST

निकृष्ट बियानांमुळे टोमॅटो हंगाम हातातून गेल्यानंतर आर्थिक गर्तेत सापडलेल्या बळीराजाला कांदापिक तरी वर काढेल, अशा आशेवर बसलेल्या उत्पादकांच्या डोळयात सध्या कांद्याने पाणी आणले आहे.

ओझर / निरगुडसर : निकृष्ट बियानांमुळे टोमॅटो हंगाम हातातून गेल्यानंतर आर्थिक गर्तेत सापडलेल्या बळीराजाला कांदापिक तरी वर काढेल, अशा आशेवर बसलेल्या उत्पादकांच्या डोळयात सध्या कांद्याने पाणी आणले आहे. किलोला ५ ते ७ रुपये इतका कमी बाजारभाव मिळत असल्याने त्यातून भांडवलही निघत नसल्याने आता कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात कांदापिक मोठ्या प्रमाणावर घेतले होते़ त्यामध्ये आंबेगाव तालुक्यासह शिरूर, खेड, जुन्नर या तालुक्यांचाही समावेश आहे़ कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी ३५ ते ४० हजार रुपये एकरी खर्च करून शेतात कांदापिक घेतले होते़ पोषक हवामानामुळे उत्पादनही चांगल्या प्रमाणात झाले़ त्या वेळी कांद्याला ७० ते ८० रुपये दहा किलोसाठी बाजारभाव मिळत होता़ हा बाजारभाव केलेल्या खर्चाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने कांदाचाळी बांधून कांद्याची साठवणूक केली़ लाखो रुपये खर्च करून कांदाचाळी बांधल्या, कांद्याचे भांडवल अधिक कांदाचाळींचा खर्च, मंजुरी सर्व खर्च अंगावर पडून आहे. शासनाकडून मिळणाऱ्या कांदाचाळींचे अनुदानदेखील मिळालेले नाही़ त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे़ कांदापिकासाठी बँका, सोसायट्या यांचे कर्ज काढून केलेला भांडवली खर्चदेखील सध्याच्या दरात वसूल होत नाही. पाच महिने बराकीत कांदा साठवून ठेवला. त्यामधील बराचसा कांदा सडला, वजन घट झाली. तरीही कांद्याचे दर वाढतच नसल्यामुळे खर्च केलेले भांडवलदेखील सध्या वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा अधिकच वाढला आहे. उन्हाळी हंगामात टोमॅटोची पिके घेतली. परंतु या पिकाला करपा, बोकड्या या रोगाच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटोचा भांडवली खर्चदेखील वसूल झाला नाही. (प्रतिनिधी)भाव आणखी कमी होणारया वर्षी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता धूसर असल्याची शक्यता ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडतदार प्रदीप मुरादे, धनेश संचेती (जुन्नर) यांनी सांगितले. साठवणगृहात सडत चाललेला कांदा, तसेच भविष्यात कांद्याचे दर वाढणार नाहीत, या शक्यतेने भीतीपोटी जुन्नर, ओतूर, तसेच ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर अधिक ढासळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांच्या अडतीचा तिढा निर्माण केल्यामुळे अडतदार व्यापारी व शेतमाल खरेदीदार व्यापारी यांच्यामधील साट्यालोट्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री कचरामोल भावात होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची खंत पिंपळगाव सिद्धनाथ येथील प्रगतिशील शेतकरी संदेश खंडागळे, संतोष खंडागळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.