शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सांगलीत सोमवारपासून टोल!

By admin | Updated: August 20, 2015 23:14 IST

कंपनीच्या पुन्हा हालचाली : शासनाच्या दिरंगाईचा फटका बसणार

सांगली : बायबॅक प्रकल्पात सांगलीच्या टोलचा समावेश करण्यासह जिल्हा न्यायालयाच्या याचिकेला आव्हान देण्याच्या बाबतीत शासनाने दप्तर दिरंगाई सुरू केली आहे. त्यामुळे अशोका बिल्डकॉन कंपनीने येत्या सोमवार (दि. २४)पासून पुन्हा टोलवसुली सुरू करण्याकरिता हालचाली गतिमान केल्या आहेत. सर्वपक्षीय कृती समितीच्या प्रयत्नांमुळे थांबलेली टोलवसुली शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा न्यायालयाने ४ आॅगस्ट २०१५ रोजी शासनास टोलवसुलीची अधिसूचना काढण्याचे आदेश दिले होते. निकालानुसार आता सांगलीच्या टोलवसुलीला १६ वर्षे ९ महिन्यांची मुदत असून, २२ मार्च २०३२ पर्यंत टोलवसुलीसाठी राज्य शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करावयाची आहे. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या आदेशाच्या अंमलबजावणीस स्थगिती मिळविण्यासाठी जिल्हा न्यायालयात केलेला अर्जही फेटाळण्यात आला आहे. जिल्हा सरकारी वकिलांशी याविषयी चर्चा करून उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, पंधरवडा उलटला तरी याचिका दाखल करण्याबाबतची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. वकीलपत्रावरील स्वाक्षऱ्यांपासून शासकीय निर्णय व मंजुरीच्या प्रक्रियेमुळे याचिकेला विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. कृती समितीचे कार्यकर्ते व शासनाने केलेल्या आवाहनास अशोका बिल्डकॉनने प्रतिसाद देऊन १0 आॅगस्टपासून सुरू होणारी टोलवसुली थांबविली होती. कंपनीने प्रतिसाद दिल्यानंतर तातडीने शासनाकडून याचिका दाखल होईल किंवा बायबॅक योजनेत सांगलीच्या टोलचा समावेश होईल, असे वाटत होते; पण प्रत्यक्षात याबाबत कोणतेही पाऊल अजून उचलले गेले नसल्याने कंपनीने येत्या सोमवारपासून टोलवसुलीला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकल्पाची पथकर वसुली बंद करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनी जानेवारी २०१४ मध्ये केलेल्या आंदोलनानंतर २० जानेवारी २०१४ पासून ही टोलवसुली बंद आहे. ६ आॅगस्ट रोजी स्थानिक सर्वपक्षीय शिष्टमंडळ व विविध संघटनांनी प्रकल्पाची पथकर वसुली उद्योजकांकडून सुरू करू नये, अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. त्यानुसार शासनाने कंपनीला आवाहन केले आणि कंपनीनेही टोलवसुली सुरू केली नाही. मात्र, पुन्हा टोलवसुली सुरू होणार असल्याने सांगलीकरांची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)