शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

महाविद्यालय प्रवेशाचा आज शेवटचा दिवस

By admin | Updated: June 30, 2016 00:45 IST

अकरावी प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीतील सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 - अकरावी प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीतील सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित केला नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे. अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी गुरूवारी शेवटचा दिवस आहे. प्रवेश निश्चित न करणारे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडतील, असेही कार्यालयाने स्पष्ट केले.याआधी अकरावीची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली होती. त्यात १ लाख ८४ हजार ९७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. मात्र दोन दिवसांत यांपैकी केवळ ८९ हजार २२९ विद्यार्थ्यांनी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केले होते. त्यामुळे उरलेल्या विद्यार्थ्यांना गुरूवारपर्यंत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. नाहीतर उरलेले विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत. परिणामी अकरावी प्रवेशासाठी गुरूवारी महाविद्यालयांच्या प्रांगणात गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्जात नोंदविलेल्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. तर अनेकांनादुसऱ्या ते पाचव्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. मात्र पहिल्या यादीत नाव निश्चित झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाही तर संबंधित विद्यार्थी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडेल. प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी आहे. तरी ४ जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.