शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

महाविद्यालय प्रवेशाचा आज शेवटचा दिवस

By admin | Updated: June 30, 2016 00:45 IST

अकरावी प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीतील सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 - अकरावी प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीतील सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित केला नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे. अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी गुरूवारी शेवटचा दिवस आहे. प्रवेश निश्चित न करणारे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडतील, असेही कार्यालयाने स्पष्ट केले.याआधी अकरावीची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली होती. त्यात १ लाख ८४ हजार ९७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. मात्र दोन दिवसांत यांपैकी केवळ ८९ हजार २२९ विद्यार्थ्यांनी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केले होते. त्यामुळे उरलेल्या विद्यार्थ्यांना गुरूवारपर्यंत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. नाहीतर उरलेले विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत. परिणामी अकरावी प्रवेशासाठी गुरूवारी महाविद्यालयांच्या प्रांगणात गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्जात नोंदविलेल्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. तर अनेकांनादुसऱ्या ते पाचव्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. मात्र पहिल्या यादीत नाव निश्चित झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाही तर संबंधित विद्यार्थी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडेल. प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी आहे. तरी ४ जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.