शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कलई कारागिरांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: April 6, 2017 02:40 IST

कलई शब्द कानावर ऐकू येत नाही. हा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कर्जत : पूर्वी घरामध्ये पितळी भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. त्या वेळी भांड्याला कलई लावा ताई कलई, असे शब्द कानी पडत होते. मात्र घरातील पितळी भांड्यांची जागा आता स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे. त्यामुळे कलई शब्द कानावर ऐकू येत नाही. हा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे राहणाऱ्या बबीताई पवार वयाच्या ६१ व्या वर्षी कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली या ठिकाणी फिरून भांड्यांना कलई लावण्याचे काम करतात. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्या हा व्यवसाय करतात. ५० वर्षे घरोघरी फिरून पितळी भांड्यांना कलई लावण्याचे काम त्यांनी केले. मात्र आता या व्यवसायावर गदा आली आहे. पितळी भांड्यांची जागा स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे. त्यामुळे आठवड्यातील एक, दोन दिवस कधीतरी छोटे-मोठे काम मिळते. संपूर्ण दिवस पायी फिरून कधी कधी कामही मिळत नाही, असे बबीताई पवार यांनी सांगितले.कलईसाठी लागणारे कलई, नवसागर, कोळसा, कॉस्टिक सोडा हे सामानही खूप महाग झाले आहे. त्यामुळे कलई लावण्याच्या पैशातही वाढ करण्यात आली आहे. भांड्याच्या आकाराप्रमाणे आम्ही पैसे आकारतो, असे बबीताई यांनी सांगितले. दोन मुले, सुना, कन्या, नातवंडे अशा संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. जोपर्यंत माझे पाय चालतात तोपर्यंत मी हा व्यवसाय करणार, असे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)पूर्वी घरामध्ये पितळी, तांब्यांच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र आता बदलत्या काळानुसार आॅल्यिुमीनिअम, स्टील आणि नॉनस्टिकच्या भांड्यांचा वापर स्वयंपाक घरात होऊ लागला आहे.पितळेच्या भांड्यांना सतत्याने कलई लावावी लागते. त्यामुळे पूर्वी गाव, शहरांमध्ये देखिल हे कलई कारागिर फिरत असत. मात्र आत्ता स्वयंपाक घरातील भांडी बदलल्यामुळे या कलई कारागिरांना काम कमी प्रमाणात मिळत आहे.