शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
3
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
4
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
5
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
6
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
7
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
8
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
9
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
10
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
11
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
12
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
14
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
15
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
16
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
17
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
18
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
19
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
20
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी

नरेंद्र मोदींपेक्षा अडवाणी चांगले म्हणण्याची वेळ : जयराम रमेश

By admin | Updated: May 26, 2017 15:53 IST

केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली.यानिमित्त "काँग्रेसच्याच योजना नाव बदलून पुन्हा जाहीर करण्याशिवाय मोदी सरकारने काहीही केलेले नाही", अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि.26  -  ""काँग्रेसचा यापूर्वीही पराभव झाला होता.  पण आम्ही पुन्हा सत्तेवर आलो.  त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे उदारमतवादी सभ्य प्रतिस्पर्धी होते.  आता मात्र मोदी यांच्यापेक्षा अडवाणी चांगले असे म्हणण्याची वेळ आली आहे.  मोदी यांना कशाचेही विधीनिषेध नाही.  मेरा भाषण मेरा शासन असा त्यांचा खाक्या आहे, अशी टीका माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केली. 
 
पुणे शहर काँग्रेसने मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कारर्कीदीचा पंचनामा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जयराम बोलत होते. काँग्रेस त्यांचा सामना करण्यात कमी पडत आहे, असेही रमेश यांनी यावेळी मान्य केले. 
 
पुढे ते असेही म्हणाले की, ""सगळे मंत्री प्रभावहीन आहेत. सामाजिक,आर्थिक, राजकीय अशा सर्व आघाड्यांवर देशाची पिछेहाट आहे. याला जबाबदार मोदीच आहेत. सांगतात एक व करतात एक अशी त्यांची निती आहे. देशाची वाटचाल लोकतंत्रकडून एकतंत्रकडे चालली आहे. मागील तीन वर्षात काँग्रेसच्याच योजना नाव बदलून पुन्हा जाहीर करण्याशिवाय मोदी सरकारने काहीही केलेले नाही"". 
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पर्यावरणाचा सत्यानाश केला आहे. आपण पर्यावरण संरक्षण मंत्री आहोत हे विसरून ते रोज किती प्रकल्प क्लिअर केले ते सांगत फिरत असतात, अशी टीकाही रमेश यांनी केली.