शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

जवानांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: December 8, 2014 03:08 IST

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षिततेचा विचार करून राज्य शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अडीच हजार जवानांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जयाज्योती पेडणेकर, मुंबई२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षिततेचा विचार करून राज्य शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अडीच हजार जवानांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे जवान कंत्राटी पद्धतीने सेवेत असून, सेवेत कायम करण्याची त्यांची मागणी आहे. या जवानांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री महाराष्ट्र, गृहमंत्री सचिव एमएसएफ, मानवाधिकार मुंबई आणि दिल्ली, संरक्षण मंत्री यांच्याकडे यासंदर्भात लेखी पत्रव्यवहार देखील केला आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणीबाणीच्या वेळी पोलिसांच्या मदतीला आणखी एक सशस्त्र दल असावे, याकरिता एप्रिल २०१० मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या धर्तीवर महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना करण्यात आली. २५० जवानांपासून सुरू करण्यात आलेल्या जवानांची संख्या आज २,५०० हजार झाली आहे. असे असतानाही गेली चार वर्षे हे जवान तुटपुंज्या पगारावर जीवन कंठत आहेत. पोलिसांच्या भरतीचे निकष लावून प्रशिक्षण घेऊनही हे जवान ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. ९ फेब्रुवारी १९८९ अन्वये ३ सप्टेंबर१९९४ च्या कायद्यांतर्गत या जवानांना नियम लागू करण्यात आला आहे. १० एप्रिलला २०१०ला या कायद्यात सुधारणा का केली नाही? या बलाच्या व्यवस्थापनेकरिता वर्दीधारी संघटनेची आवश्यकता आहे. मात्र महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील निवृत्त कर्मचारी याचे व्यवस्थापन करीत आहेत. रायफल चालविण्याचे प्रशिक्षण सर्वांना आवश्यक असतानाही काही निवडक नवीन आलेल्या जवानांना प्रशिक्षण दिले जाते हा भेदभाव का, असा सवाल हे जवान उपस्थित करीत आहेत. जर आम्हाला सरकारी सुविधा देता येत नसतील, तर हे दल बरखास्त करून आमचा राज्याच्या पोलीस विभागात समावेश करावा, अशी मागणी या जवानांनी केली आहे. पूर्वी ८,५०० इतक्या तुटपुंज्या वेतनात हे जवान कर्तव्य बजावत होते. २७ नोव्हेंबरपासून केवळ एक हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली. जुनाट शस्त्रे, तुटपुंजे वेतन, सोयीसुविधांचा अभाव यामुळे हे जवान कमालीचे वैतागले आहेत.