शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

जवानांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: December 8, 2014 03:08 IST

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षिततेचा विचार करून राज्य शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अडीच हजार जवानांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जयाज्योती पेडणेकर, मुंबई२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षिततेचा विचार करून राज्य शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अडीच हजार जवानांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे जवान कंत्राटी पद्धतीने सेवेत असून, सेवेत कायम करण्याची त्यांची मागणी आहे. या जवानांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री महाराष्ट्र, गृहमंत्री सचिव एमएसएफ, मानवाधिकार मुंबई आणि दिल्ली, संरक्षण मंत्री यांच्याकडे यासंदर्भात लेखी पत्रव्यवहार देखील केला आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणीबाणीच्या वेळी पोलिसांच्या मदतीला आणखी एक सशस्त्र दल असावे, याकरिता एप्रिल २०१० मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या धर्तीवर महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना करण्यात आली. २५० जवानांपासून सुरू करण्यात आलेल्या जवानांची संख्या आज २,५०० हजार झाली आहे. असे असतानाही गेली चार वर्षे हे जवान तुटपुंज्या पगारावर जीवन कंठत आहेत. पोलिसांच्या भरतीचे निकष लावून प्रशिक्षण घेऊनही हे जवान ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. ९ फेब्रुवारी १९८९ अन्वये ३ सप्टेंबर१९९४ च्या कायद्यांतर्गत या जवानांना नियम लागू करण्यात आला आहे. १० एप्रिलला २०१०ला या कायद्यात सुधारणा का केली नाही? या बलाच्या व्यवस्थापनेकरिता वर्दीधारी संघटनेची आवश्यकता आहे. मात्र महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील निवृत्त कर्मचारी याचे व्यवस्थापन करीत आहेत. रायफल चालविण्याचे प्रशिक्षण सर्वांना आवश्यक असतानाही काही निवडक नवीन आलेल्या जवानांना प्रशिक्षण दिले जाते हा भेदभाव का, असा सवाल हे जवान उपस्थित करीत आहेत. जर आम्हाला सरकारी सुविधा देता येत नसतील, तर हे दल बरखास्त करून आमचा राज्याच्या पोलीस विभागात समावेश करावा, अशी मागणी या जवानांनी केली आहे. पूर्वी ८,५०० इतक्या तुटपुंज्या वेतनात हे जवान कर्तव्य बजावत होते. २७ नोव्हेंबरपासून केवळ एक हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली. जुनाट शस्त्रे, तुटपुंजे वेतन, सोयीसुविधांचा अभाव यामुळे हे जवान कमालीचे वैतागले आहेत.