शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

यंदा देवगिरीवर कोण ?

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

राज्यात प्रथमच सत्तारूढ झालेल्या भाजपप्रणीत सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात होणार असून यावेळी ते तीन आठवड्याचे राहण्याची शक्यता आहे, तसे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

विधिमंडळ अधिवेशन: कालावधी वाढण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेतनागपूर: राज्यात प्रथमच सत्तारूढ झालेल्या भाजपप्रणीत सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात होणार असून यावेळी ते तीन आठवड्याचे राहण्याची शक्यता आहे, तसे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान सध्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद नसल्याने त्यांच्यासाठी राखीव देवगिरी बंगला कोणत्या मंत्र्याला मिळतो याकडेही लक्ष लागले आहे.नागपूर कराराप्रमाणे ठरलेल्या कार्यकाळानुसार म्हणजे सहा आठवडे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालावे ही मागणी विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष प्रत्येक अधिवेशनात करीत आला आहे. खुद्द फडणवीस यांनी आमदार म्हणूनही ही मागणी वेळोवेळी केली आहे. आता भाजपचीच सत्ता आहे आणि फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आघाडी सरकारच्या तुलनेत यावेळी अधिवेशनाचा कार्यकाळ अधिक असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केल्यावर त्यांनी अतिशय कौशल्याने कार्यकाळाच्या मुद्यावर बोलणे टाळले. मात्र अधिवेशनासाठी तयार होणाऱ्या विषय पत्रिकेवरील शेवटचा विषय चर्चेला येईपर्यंत अधिवेशन चालणार, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कार्यकाळ वाढविण्याबाबत आतापर्यंत भाजपचीच आग्रही भूमिका राहात आली आहे. दोनच आठवड्यात अधिवेशन गुंडाळल्यास आघाडी सरकार व भाजप सरकार यांच्यात फरक काय, अशी टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तीन आठवडे तरी अधिवेशन चालावे यादृष्टीने कामकाजाचे स्वरूप ठरविण्याबाबत गांभीर्याने विचार होत असल्याची माहिती आहे. असे झाल्यास यंदा अधिवेशनाचा कार्यकाळ वाढू शकतो.दरम्यान अधिवेशन आले की मंत्र्यांच्या बंगल्याची चर्चा सुरू होते. युती शासनापासून तर आघाडी शासनापर्यंत तब्बल २० वर्षे नागपूरमधील देवगिरी बंगला उपमुख्यमंत्र्यासाठी राखीव ठेवला जातो. सध्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नाही. शिवसेनेने हे पद मागितले असले तरी भाजपची ते देण्याची इच्छा नाही. त्यामुळे अधिवेशनाच्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी उपमुख्यमंत्री कोणी होईल याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे यावेळी देवगिरीवर मुक्काम कोणाचा हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गृहमंत्र्यांकडे हा बंगला जाऊ शकतो. पण हे खातेसुद्धा सध्यातरी मुख्यमंत्र्यांकडेच आहे. त्यामुळे अर्थ किंवा महसूल मंत्री या बंगल्यासाठी प्रयत्न करू शकतात, अशी माहिती आहे.(प्रतिनिधी)रविभवनातील आरक्षण बंदअधिवेशनासाठी बंगल्याची दुरुस्ती करायची असल्याने १ नोव्हेंबर पासून रविभवनातील तसेच आमदार निवासातील खोल्यांचे आरक्षण बंद करण्यात आले आहे. यावेळी सर्व मंत्रिमंडळच नवीन असल्याने रविभवनात कोण कुणाचे शेजारी राहणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर किती खर्च होणार याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या खर्चावर भाजपने यापूर्वी टीका केली आहे हे येथे उल्लेखनीय.