शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

२०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त

By admin | Updated: December 6, 2014 02:26 IST

दुष्काळ निवारणाच्या वेगवेगळ्या योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकत्रितपणे राबवून २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला आहे,

मुंबई : दुष्काळ निवारणाच्या वेगवेगळ्या योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकत्रितपणे राबवून २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९, या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाशी संबंधित विविध उपक्रम एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येतील. यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार करून त्या विभागास उपयुक्त असे प्रकल्प हाती घेण्यात येतील. यासाठी निधीची कमतरता राहणार नाही. यात केंद्र शासनाचाही सहभाग वाढविण्यात येणार आहे. या अभियानाचे नियंत्रण मुख्यमंत्री ट्रान्सफॉर्मेशन आॅफिस (सीएमटीओ) मार्फत केले जाईल. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे करीत असताना एखादे काम सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाचा अक्षांश-रेखांशासह डिजिटल फोटो काढून वेबसाइटवर टाकले जातील़ त्यामुळे काम झाले की नाही, हे लक्षात येणार आहे.प्रकल्प अंमलबजावणीच्या नियमित अहवालाचे परीक्षण, समीक्षण आणि विश्लेषण करण्यात येईल. या सर्व कामांवर नियंत्रणासाठी डिलिव्हरीचेंज फाउंडेशन या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिषदेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, संबंधित विभागांचे प्रधान सचिव, सचिव, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, समाजसेवी संस्था व इतर मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)> वैद्यकीय अध्यापकांना विभागीयसंवर्ग संरचनेतून वगळलेवैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील नियुक्त अध्यापकांना पदस्थापना देण्याकरिता विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप नियमावली २०१० मधून वगळण्यास मान्यता दिली. अध्यापकांची कमतरता असून त्यावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.