शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

२०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त

By admin | Updated: December 6, 2014 02:26 IST

दुष्काळ निवारणाच्या वेगवेगळ्या योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकत्रितपणे राबवून २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला आहे,

मुंबई : दुष्काळ निवारणाच्या वेगवेगळ्या योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकत्रितपणे राबवून २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९, या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाशी संबंधित विविध उपक्रम एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येतील. यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार करून त्या विभागास उपयुक्त असे प्रकल्प हाती घेण्यात येतील. यासाठी निधीची कमतरता राहणार नाही. यात केंद्र शासनाचाही सहभाग वाढविण्यात येणार आहे. या अभियानाचे नियंत्रण मुख्यमंत्री ट्रान्सफॉर्मेशन आॅफिस (सीएमटीओ) मार्फत केले जाईल. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे करीत असताना एखादे काम सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाचा अक्षांश-रेखांशासह डिजिटल फोटो काढून वेबसाइटवर टाकले जातील़ त्यामुळे काम झाले की नाही, हे लक्षात येणार आहे.प्रकल्प अंमलबजावणीच्या नियमित अहवालाचे परीक्षण, समीक्षण आणि विश्लेषण करण्यात येईल. या सर्व कामांवर नियंत्रणासाठी डिलिव्हरीचेंज फाउंडेशन या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिषदेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, संबंधित विभागांचे प्रधान सचिव, सचिव, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, समाजसेवी संस्था व इतर मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)> वैद्यकीय अध्यापकांना विभागीयसंवर्ग संरचनेतून वगळलेवैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील नियुक्त अध्यापकांना पदस्थापना देण्याकरिता विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप नियमावली २०१० मधून वगळण्यास मान्यता दिली. अध्यापकांची कमतरता असून त्यावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.