शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या निशाण्यावर भारताचे वाघ !

By admin | Updated: September 6, 2016 18:44 IST

जगात १३ देशांत वाघांचे अस्तित्व असले तरी भारताचे वाघ हे आंतरराष्ट्रीय निशाण्यावर आहेत.

गणेश वासनिक/ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. 6 - जगात १३ देशांत वाघांचे अस्तित्व असले तरी भारताचे वाघ हे आंतरराष्ट्रीय निशाण्यावर आहेत. दरवर्षी १०० पेक्षा अधिक वाघांची शिकार होत असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय व्याघ्र संर्वधन प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्करीच्या बाजारपेठेवर कोणत्याही देशाचा अंकुश नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

सन २००० ते २०१४ या दरम्यान जगातल्या १३ देशांपैकी ११ देशांत वाघ अवयवांच्या तस्करीच्या हजारो घटना घडल्या आहेत. चीन, थायलंडमध्ये टायगर फार्म हाऊस असून अन्य ११ देशांपैकी भारतात जंगल आणि नैसर्गिक सान्निध्यात वावरणारे वाघांचे संवर्धन, संरक्षण केले जाते. जगात एकूण वाघ संख्येपैकी निम्मे वाघ एकट्या भारतात असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर वाघ तस्करांनी भारतातील वाघांना लक्ष्य केले आहे.

तसेच सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पही भारतात असल्याची नोंद आहे. वाघ अवयवांची आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी तस्करी रोखण्यासाठी भारताने सेंट पिटर बर्ग येथे पार पडलेल्या पहिल्या जागतिक व्याघ्र परिषदेत टायगर फार्म हाऊसला कडाडून विरोध केला होता. टायगर फार्म हाऊसच्या नावाखाली वाघांची शिकार, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाघ अवयवांची तस्करी आदी बाबींमुळे वाघ नामशेष होण्याची भीती वर्तविली होती. वाघांचे संवर्धन हे जंगल आणि नैसर्गिकरीत्या होणे अत्यावश्यक असल्याचा मुद्दा या परिषदेत भारताने प्रामुख्याने मांडला होता.

त्यानंतर या परिषदेत सन २०२२ पर्यंत वाघांची संख्या वाढविण्याचे धोरण आखले गेले. त्याअनुषंगाने भारताने व्याघ्र संवर्धनात आघाडी घेतली आहे. तथापि चीन, नेपाळ, पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय वाघ अवयवांची स्थानिकांना हाताशी धरून तस्करी होत असल्याचे सीबीआयने यापूर्वीच वाघ शिकारप्रकरणी केंद्र सरकारला पाठविलेल्या अहवालातून स्पष्ट केले आहे. भारताच्या व्याघ्र संवर्धनात सर्वाधिक बंगाली प्रजातींचे वाघ असून त्यांच्या अवयवांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. देशात दरवर्षी १०० पेक्षा जास्त वाघांची शिकार होत असताना ही बाब जागतिक स्तरावर ठोसपणे मांडली जात नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वाघाच्या शिकारीसाठी स्थानिकांना मिळणारे ४० ते ५० लाख रुपये हे त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन झाले आहे.

वाघांच्या अस्तित्वाची इत्यंभूत माहिती गोळा करून नियोजन पद्धतीने शिकार करणे, त्यानंतर वाघ अवयवांची आंतरराष्ट्रीय तस्करी करण्यात काही स्थानिकांचा हातखंडा आहे. दिल्ली, बंगळूर, चेन्नई, कोलकाता, जयपूर, हैद्राबाद, मध्यप्रदेशातील कटनी तसेच नागपूर हे वाघ अवयव तस्करीचे प्रमुख केंद्र बनले आहेत. नेपाळ, भुतानमार्गे आणि पाकिस्तानातून सीमेपार वाघ अवयवांची तस्करी होत असल्याचे जवळपास सिद्ध झाले आहे. अमेरिका, चीन या दोन देशांत भारतातील वाघ अवयवांची तस्करी होत असून ही बाब आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषदेतही चर्चिली गेली. आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्करी रोखण्यासाठी भारताने पुढाकार न घेतल्यास देशातील वाघांची संख्या झपाट्याने कमी होईल, अशी भीती वन्यजीवप्रेमींनी वर्तविली आहे.

वाघ तस्करीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कायम असल्यामुळे वाघांचे संगोपन, संवर्धन करणे आता दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. ज्या देशात वाघांचे अस्तित्व आहे, त्या देशांनी यासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. विशेषत: भारतासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्करी ही मोठी समस्या ठरत आहे.- दिनेश त्यागी,क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्पया देशात आहे वाघांचे अस्तित्व जगात १३ देशांत वाघांचे अस्तित्व आहे. यात रशिया, चीन, भारत, बांग्लादेश, भूतान, कम्बोडिया, व्हियतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, थायलंड, नेपाळ, लासा या देशांचा समावेश आहे.व्याघ्र संवर्धनातील कर्मचाऱ्यांकडे निकामी शस्त्रेभारतात एकूण ३९ व्याघ्र संवर्धन प्रकल्प आहेत. सन २०१४ साली झालेल्या व्याघ्र गणनेत देशात २,२२६ वाघांची नोंद करण्यात आली आहेत. भारताचे वाघ हे आंतरराष्ट्रीय तस्करांच्या निशाण्यावर आहेत. स्थानिक व्याघ्र तस्करांना आंतरराष्ट्रीय तस्कर अद्ययावत शस्त्रसाठा पुरवित असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे व्याघ्र संवर्धनातील कर्मचाऱ्यांक डे सोपविलेली निकामी शस्त्रे बघता ते कदापिही तस्करांचा मुकाबला करू शकत नाही, हे वास्तव आहे.