शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मुंब्रा अग्निशमन केंद्रातून वस्तूंना फुटले पाय

By admin | Updated: October 18, 2016 03:38 IST

२६ जुलै २००५ च्या महापुरात ज्यांचे नुकसान झाले, त्या पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून पाठवण्यात आले

कुमार बडदे,

मुंब्रा- २६ जुलै २००५ च्या महापुरात ज्यांचे नुकसान झाले, त्या पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून पाठवण्यात आलेल्या, मात्र वाटप न झालेल्या संसारोपयोगी वस्तूंची तब्बल ११ वर्षांनंतर येथील अग्निशमन केंद्राच्या गोदामामधून पळवापळवी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.दि. २६ जुलै २००५ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरालाही मुसळधार पर्जन्यवृष्टीचा फटका बसला होता. येथील आंबेडकरनगर, शिवाजीनगर, अमृतनगर, कैलासनगर, रशीद कम्पाउंड इत्यादी ठिकाणच्या नागरी वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. त्यामध्ये हजारो लोकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. त्यांचे संसार परत उभे राहावेत, यासाठी तत्कालीन सरकारने तातडीची मदत म्हणून रोख रक्कम तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बादल्या, चटया, पोळपाट-लाटणे तसेच स्टीलची ताटे-वाट्या पाठवण्यात आल्या होत्या. त्यातील अवघ्या २० टक्के साहित्याचेच वाटप करण्यात आले होते. उर्वरित साहित्य मागील ११ वर्षांपासून येथील अग्निशमन केंद्राच्या पहिल्या मजल्यावरील गोदामामध्ये पडून होते. अग्निशमन दलाची ही इमारत धोकादायक ठरवण्यात आल्यामुळे सध्या ती पाडण्याचे काम सुरू आहे. बांधकाम पाडत असताना येथील एका भांडारगृहात शिल्लक साहित्य ठेवण्यात आल्याचे निदर्शनास येताच अग्निशमन दलाच्या काही कर्मचाऱ्यांनी त्याची पळवापळवी सुरू केली. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.>आधीही झाल्या चोऱ्या यापूर्वीही गोदामाचे कुलूप तोडून पूरग्रस्तांकरिता आलेले साहित्य लांबवण्यात आले होते, अशा माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. येथील जनरेटरची अलीकडेच चोरी झाली होती आणि पुन्हा तो मूळ जागी ठेवण्यात आला होता.