शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा अग्निशमन केंद्रातून वस्तूंना फुटले पाय

By admin | Updated: October 18, 2016 03:38 IST

२६ जुलै २००५ च्या महापुरात ज्यांचे नुकसान झाले, त्या पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून पाठवण्यात आले

कुमार बडदे,

मुंब्रा- २६ जुलै २००५ च्या महापुरात ज्यांचे नुकसान झाले, त्या पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून पाठवण्यात आलेल्या, मात्र वाटप न झालेल्या संसारोपयोगी वस्तूंची तब्बल ११ वर्षांनंतर येथील अग्निशमन केंद्राच्या गोदामामधून पळवापळवी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.दि. २६ जुलै २००५ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरालाही मुसळधार पर्जन्यवृष्टीचा फटका बसला होता. येथील आंबेडकरनगर, शिवाजीनगर, अमृतनगर, कैलासनगर, रशीद कम्पाउंड इत्यादी ठिकाणच्या नागरी वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. त्यामध्ये हजारो लोकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. त्यांचे संसार परत उभे राहावेत, यासाठी तत्कालीन सरकारने तातडीची मदत म्हणून रोख रक्कम तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बादल्या, चटया, पोळपाट-लाटणे तसेच स्टीलची ताटे-वाट्या पाठवण्यात आल्या होत्या. त्यातील अवघ्या २० टक्के साहित्याचेच वाटप करण्यात आले होते. उर्वरित साहित्य मागील ११ वर्षांपासून येथील अग्निशमन केंद्राच्या पहिल्या मजल्यावरील गोदामामध्ये पडून होते. अग्निशमन दलाची ही इमारत धोकादायक ठरवण्यात आल्यामुळे सध्या ती पाडण्याचे काम सुरू आहे. बांधकाम पाडत असताना येथील एका भांडारगृहात शिल्लक साहित्य ठेवण्यात आल्याचे निदर्शनास येताच अग्निशमन दलाच्या काही कर्मचाऱ्यांनी त्याची पळवापळवी सुरू केली. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.>आधीही झाल्या चोऱ्या यापूर्वीही गोदामाचे कुलूप तोडून पूरग्रस्तांकरिता आलेले साहित्य लांबवण्यात आले होते, अशा माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. येथील जनरेटरची अलीकडेच चोरी झाली होती आणि पुन्हा तो मूळ जागी ठेवण्यात आला होता.