शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

‘स्मार्ट’साठी साडेतीन वर्षे

By admin | Updated: September 22, 2016 03:40 IST

स्मार्ट सिटी योजना पाच वर्षांत मार्गी लावण्याचे प्रस्तावित असले तरी तिसऱ्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश झाला आहे.

कल्याण : केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना पाच वर्षांत मार्गी लावण्याचे प्रस्तावित असले तरी तिसऱ्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश झाला आहे. त्यामुळे आता केवळ साडेतीन वर्षे शिल्लक राहिले आहेत. परिणामी, सर्वांना एकत्रित घेऊन ही योजना लवकरात लवकर कशी मार्गी लावता येईल, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी बुधवारी केले.‘स्मार्ट सिटी’मधून कल्याण-डोंबिवलीत दोन हजार ३२ कोटींची विकासकामे केली जाणार आहेत. त्यासाठी बुधवारी ‘स्मार्ट सिटी’साठी स्थापन केलेल्या एसपीव्ही कंपनीची बैठक केडीएमसी मुख्यालयात झाली. एमएमआरडीएचे आयुक्त मदान यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन, प्रांताधिकारी प्रसाद उकिर्डे, पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे, सभागृह नेते राजेश मोरे, स्थायी समिती सभापती संदीप गायकर, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, प्रभारी शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी आदी अधिकारी, पदाधिकारी व कंपनीचे संचालक उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मदान यांनी स्मार्ट सिटी योजना कल्याण-डोंबिवलीत राबवण्यासाठी कशा प्रकारे नियोजन केले आहे, याची माहिती दिली. पायाभूत सुविधा व पाणीपुरवठ्यात सुधारणा, घनकचऱ्यावर प्रक्रिया अशा प्रकारची ३० विकासकामे या योजनेंतर्गत एकाच वेळी केली जाणार आहेत. रेल्वे स्थानक परिसरांचा विकास केला जाणार असल्याने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या कंपनीत निमंत्रित म्हणून सामावून घेतले जाईल. महापालिका आणि नागरिक यांच्यात चांगला संवाद व्हावा, यासाठी आयटीसंबंधी प्रकल्प हाती घेतला जाईल, असे मदान यांनी स्पष्ट केले. विकासकामांचे विकास आराखडे तयार करण्यासाठी एजन्सी नेमण्यात येणार आहे. सगळ्या कामांची सुरुवात एकत्रित केली जाणार आहे. रिंगरूट प्रकल्प हा देखील या योजनेचा एक भाग आहे. हे काम दोन महिन्यांत सुरू होणार आहे, असे मदान यांनी सांगितले. (प्रतिनिधी) >एमएमआरडीएचा काही प्रकल्पांसाठी निधी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेतल्या जाणाऱ्या काही विकासकामांसाठी एमएमआरडीए स्वत: देणार आहे. काही प्रकल्पांसाठी केंद्राचा ५०, तर राज्य आणि महापालिकेचा प्रत्येकी २५ टक्के हिस्सा असेल. >बाधितांचे नियमानुसार पुनर्वसनप्रस्तावित विकासकामांत बाधित होणाऱ्यांचे सरकारी नियमानुसार पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शहरे स्मार्ट करण्याचा सरकारचा उद्देश आहे. नागरिकांनाच त्याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले. कामे रखडणार नाहीत पैशांअभावी कोणतीही कामे रखडणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. जलदगतीने कामे मार्गी लागावीत, यासाठी दरमहिन्याला कंपनीची आढावा बैठक होईल, असेही मदान म्हणाले.