शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
4
अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले सिवानचे जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
5
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
6
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
7
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
8
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
9
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
10
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
11
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
12
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
13
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
14
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
15
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
16
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
17
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
18
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
19
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
20
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...

पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्षे कैद

By admin | Updated: April 8, 2017 05:05 IST

पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला आता तीन वर्षांपर्यंतची कैदेची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे.

मुंबई : पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला आता तीन वर्षांपर्यंतची कैदेची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असणार आहे. मात्र, खोटी तक्रार करणाऱ्या पत्रकारालादेखील तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे. यासंबंधीचे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडले. विधानसभा आणि विधान परिषदेनेही हे विधेयक एकमताने मंजूर केले. राज्यातील पत्रकारांवर सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी विविध पत्रकार संघटनांनी गेली अनेक वर्षे लावून धरली होती. पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला. शिवाय भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी कोणतीही चर्चा न करता एकमताने विधेयकास मंजुरी दिली. पत्रकारांवरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा मानला जाईल. तो प्रथमश्रेणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयाकडून चौकशी करण्यायोग्य असेल. या कायद्यानुसार केवळ पत्रकारच नव्हे, तर प्रसारमाध्यम कार्यालय, छापखाना यांनाही संरक्षण मिळाले आहे. म्हणजेच वृत्तपत्र अथवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या कार्यालयावरील, छापखान्यावरील हल्लादेखील या कायद्याअंतर्गत गुन्हा असेल. संपादक, वृत्तसंपादक, उपसंपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, व्यंगचित्रकार, वृत्तछायाचित्रकार, दूरचित्रवाणी कॅमेरामन, अग्रलेखक, प्रसंगविशेष लेखक, संहिता तपासनीस, मुद्रितशोधक यांना हे संरक्षण मिळणार आहे. (विशेष प्रतिनिधी)>खोटी तक्रार करणाऱ्या पत्रकारालाही शिक्षाखोटी तक्रार करून एखाद्या प्रकरणात कोणाला गोवण्याचा प्रयत्न पत्रकाराच्या अंगलट येणार आहे. कारण, त्याची तक्रार खोटी होती असे लक्षात आले तर त्यालाही तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकेल. अशा पत्रकारास सर्व प्रकारच्या शासकीय लाभापासून कायमचे वंचित करण्यात येईल.