शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुलावर कार आदळून तिघे ठार

By admin | Updated: March 14, 2017 21:48 IST

भरधाव वेगाने जाणारी कार पुलावर आदळून झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाले.

लोकमत आॅनलाईनअहमदनगर, दि. 14 - भरधाव वेगाने जाणारी कार पुलावर आदळून झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारातील नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. मयतापैकी दोघे संगमनेरचे व एक जामखेड तालुक्यातील आरणगावचा आहे.

संकेत संजय बोरा (वय १९) रा. आरणगाव , ता. जामखेड , प्रथमेश विष्णू भिंगारे (वय १९ ) रा.इंदिरादगर, संगमनेर व आदित्य श्रीगोपाळ तिवारी (वय १८, रा. देवाचा मळा, संगमनेर) असे ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. हे तिघे पुणे येथे शिकत असून ते पुण्याहून संगमनेरकडे फियाट पुंटो कारने(क्र. एम.एच.२९ आर. ५४२५) येत होते. नाशिक -पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन येताना वाहनचालकास रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार रस्त्यावरील पुलाच्या भिंतीवर आदळली. या अपघातात संकेत व प्रथमेश दोघे जण गाडीतच अडकून पडले. त्यांचे मृतदेह परिसरातील गणेश राक्षे,मनोज राक्षे, संतोष मांडेकर , अभिषेक गुंजाळ, सुनिल ढगे या युवकांनी गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढले. तिसरा आदित्य तिवारी हा पुलालगत पडलेला होता. तिघांनाही मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक विनय सरवदे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघाताचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकूल वातावरणात मंगळवारी दुपारी संगमनेरच्या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)