शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी तीन अभियंते तडकाफडकी निलंबित

By admin | Updated: May 5, 2015 01:13 IST

बंद रोहित्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली. यात वीज वितरणला दोषी ठरवून दंड आकारण्यात आला. या दंडाचा वचपा काढण्यासाठी

यवतमाळ : बंद रोहित्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली. यात वीज वितरणला दोषी ठरवून दंड आकारण्यात आला. या दंडाचा वचपा काढण्यासाठी कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका शेतकऱ्याला वीजचोरीच्या खोट्या आरोपात अडकविले. ४० वर्षांपासून नियमित वीजबिल भरणारा वृद्ध शेतकरी व्यथित झाला आणि त्यातच त्याचा सोमवारी त्याचा मृत्यू झाला. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. दरम्यान, महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांच्यासह उपकार्यकारी अभियंता आणि साहाय्यक अभियंत्यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित केले. अमरलाल मनिहार (८०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते बाभूळगाव तालुक्यातील चिमणाबागापूरचे रहिवासी होते. त्यांच्या शेताला वीज पुरवठा करणारी डीपी जळाली. दुसरी डीपी बसविण्याची मागणी अमरलाल यांच्यासोबतच इतर शेतकऱ्यांनी केली. त्यावेळी थकीत बिल भरण्याचा मुद्दा कंपनीने पुढे केला. या कालावधीत तीन महिने लोटून गेले. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेवटी शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर लगेच नवीन डीपी बसविण्यात आली. या प्रकरणात कंपनीला दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. दंड ठोठावण्याचा वचपा म्हणून वीज चोरीचा आळ घेणे सुरू केले. अमरलाल यांच्या शेतात धाड घातली. त्यावेळी शेतात वीज मीटर लावलेले होते. तरीही कारवाई करण्यात आली. पंचनाम्यावर कंत्राटदाराने मजुरांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. नियमित वीज भरण्याचा आळ घेतल्याने मणिहार यांनी खाट धरली. (वार्ताहर)