शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीत महाराष्ट्राला भेडसावताहेत तीन चिंता

By admin | Updated: September 23, 2016 04:30 IST

महाराष्ट्राने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकाला मंजुरी दिली असली तरी त्याच्या तीन काळज्या अजून पूर्णपणे संपलेल्या नाहीत.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीमहाराष्ट्राने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकाला मंजुरी दिली असली तरी त्याच्या तीन काळज्या अजून पूर्णपणे संपलेल्या नाहीत. जीएसटी काउन्सिलच्या येथे भरलेल्या पहिल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेले अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री अरूण जेटली यांची पुन्हा एकदा याच चिंतांबाबत भेट घेतली आहे. कौन्सिलच्या पहिल्याच बैठकीत १ एप्रिलपासून जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जीएसटीचा दर ठरविणे आणि आवश्यक ते कायदे व नियम करणे ही दोन आव्हाने सरकारपुढे आहेत. तरीही हे सारे लवकरात लवकर पूर्ण करून, १ एप्रिलपासूनच जीएसटी लागू करावी, असे निश्ति करण्यात आले. जीएसटी लागू करण्यासाठी उलाढालीची किमान मर्यादा असावी, याबाबत मात्र बैठकीत एकमत झाले नाही. लहान आणि कमी औद्योगिकरण असलेल्या राज्यांनी ही मर्यादा कमी असावी, अशी मागणी केली. ही बैठक उद्याही सुरू राहणार आहे.मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की,‘‘जीएसटीच्या मुद्यावर मी जेटलींशी चर्चा केली. आम्हाला वाटणाऱ्या तीन काळज्या आम्ही त्यांना सांगितल्या व जीएसटीमध्ये अशी तरतूद करा की महाराष्ट्राला वाटणारी चिंता दूर होईल, असे त्यांना आवाहनही केले. राज्याला कर आणि जकात यातून मिळणाऱ्या महसुलावर पाणी सोडण्याची वेळ येऊ नये.’’ मुनगंटीवार म्हणाले की जेटली यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. जेटली यांनी खात्री दिली की करांचे दर आणि इतर धोरण निश्चित करताना महाराष्ट्राला वाटणाऱ्या सगळ््या चिंता विचारात घेतल्या जातील. जेटली यांनी जीएसटीचा दर निश्चित करण्याबाबत ते बहुमताच्या आधारे ठरविले जाऊ शकते व ते एकमताने सर्व काही व्हावे या मताचे आहेत, असे म्हटले. काहीही झाले तरी एक एप्रिल २०१७ पासून सरकारला जीएसटी संपूर्ण देशात लागू करायचा आहे. जीएसटीला भारतातील सगळ््यात मोठी कर सुधारणा मानली जात आहे. देशभरात जीएसटी लागू झाले की उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, सेवा शुल्क, व्हॅट आणि जकात यासारखे अनेक कर संपून जातील व फक्त एकच कर रचना अमलात येईल.राज्यांची मागणी अशी आहे की त्यांना १.५ कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपन्यांना कर लागू करण्याचा कायदेशीर व प्रशासनीक अधिकार दिला गेला पाहिजे. जेटली यांच्यासोबत गेल्या २६ जुलै रोजी झालेल्या बैठकीत राज्यांनी आपली ही भूमिका आधीच स्पष्ट केली होती. राज्य सरकारांसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता की केंद्र सरकारला कर लावण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. मिळालेल्या महसुलाचे वाटप नंतर राज्यांना केंद्राकडून होईल व राज्यांची मागणी अशी होती की कर आकारणीचा अधिकार आम्हाला असला पाहिजे व आम्ही नंतर केंद्राला त्याचा त्यातील वाटा देऊन टाकू.