शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरमध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By admin | Updated: November 1, 2016 12:29 IST

अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून आणखी तिघांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 1 - अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून आणखी तिघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. जुन्नरमधील ही घटना आहे. मृतांमध्ये तीनही मुलांचा समावेश आहे. राहुल फुलमाळी, साईराज फुलमाळी आणि धनराज फुलमाळी अशी मृत पावलेल्या मुलांची नावे असून, ही मुले 4-8 वयोगटातील असल्याची माहिती मिळते आहे.
 
तर प्रकृती खालावलेल्या तीन जणांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी फुलमाळी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
 
सोमवारी रात्री जेवणानंतर दोन मुलांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला तर एकाने  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. मात्र, विषबाधा होण्यामागचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे. 
 
दरम्यान, मुलांनी फराळ केल्यानंतर बाहेरुन आणलेली मिठाईदेखील खाल्ली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.