शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

राज्यात दरदिवशी तीन लाचखोर जाळ्यात

By admin | Updated: October 12, 2016 06:23 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षम कारभारामुळे राज्यात दरदिवशी तीन लाचखोरांवर कारवाई होत आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या ९ महिन्यात तब्बल ७८१ लाचखोरांना रंगेहाथ पकडले

आप्पासाहेब पाटील / सोलापूरलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षम कारभारामुळे राज्यात दरदिवशी तीन लाचखोरांवर कारवाई होत आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या ९ महिन्यात तब्बल ७८१ लाचखोरांना रंगेहाथ पकडले. तर अपसंपदाच्या ११ तर अन्य भ्रष्टाचाराचे ११ इतर गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांनी राज्यातील एसीबीच्या सर्वच अधिकाऱ्यांना नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीवर निर्णय घेणे सक्तीचे केले. एसीबीच्या कारवाईसाठी जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे, हे ओळखून टोल फी क्रमांक, आॅनलाइन तक्रारी घेणे सुरू केले आहे (प्रतिनिधी)राज्यात चालू वर्षात आतापर्यंत ७८१ लाचखोर जाळ्यात सापडले. यात सर्वाधिक १४९ कारवाया पुणे विभागात झाल्या. त्या खालोखाल नाशिक ११५, नागपूर १११, औरंगाबाद १०४, नांदेड ८७, अमरावती ८८, ठाणे ९२ आणि मुंबईत ५७ लाचखोरांना पकडण्यात आले. महसूल व पोलीस विभाग टॉपवरराज्यात एसीबीने जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराच्या कारवाईत तब्बल ७८१ जणांना पकडले़ यात सर्वाधिक लाचखोर म्हणजेच २२२ हे पोलीस विभाग तर २२० हे महसूल विभागातील आहेत़ याशिवाय पंचायत समिती ९९, म़रा़वि़मं़ ५६, महानगरपालिका ४९, शिक्षण विभागात ६३ कारवायांत लाचखोरांना पकडण्यात आले. १ कोटी ७४ लाखांची मालमत्ता जप्तसापळा कारवाईदरम्यान एसीबीच्या पथकाने राज्यातील ९९१ आरोपींकडून १ कोटी ७४ लाख १९ हजार २२३ रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे़ याशिवाय पोलीस विभागाची २२ लाख ७० हजार ५४५, महसूल विभागाची १८ लाख ३५ हजार ९२८ एवढी मालमत्ता जप्त केली आहे़