शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

जेटीवर उभ्या असलेल्या तीन बोटी बुडाल्या

By admin | Updated: September 22, 2016 03:20 IST

तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून पुरिस्थतीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

डहाणू/बोर्डी : तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून पुरिस्थतीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर घरांमध्ये पाणी शिरले. डहाणू प्रमुख राज्य मार्ग पाण्याखाली गेल्याने रस्त्ये वाहतूक पुर्णपणे ठप्प होऊन नागरिक अनेक ठिकाणी अडकले होते. झाई समुद्रकिनारी जेटीवर उभ्या तीन बोटी पुरात बुडल्या असून, अन्य बोटींचे नुकसान झाले आहे. दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई समुद्रकिनारी जेटीवर सुमारे अडीचशे बोटी उभ्या होत्या. पुराच्या पाण्यामुळे त्या पैकी इंद्रउचद अण्णा माच्छी या बोटमालकांची साईरामप्रसाद, सुनीता चंद्रकांत माच्छी यांची जलाराम व झाई पुलनाजीक मांगेला मच्छीमार सोसायटीची एक बोट अश्या तीन बोटी बुडल्या असून बोटीतील साहित्य वाहून गेले. तर अन्य तीन बोटींचे नुकसान झाल्याने मासेमारी हंगामाला मुकणार असून मिच्छमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. डहाणू तालुक्यात २० व २१ सप्टेंबर या काळात एकूण ५२८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे पुरिस्थती येऊन, अनेक गावातील घरांमध्ये पाणी शिरले, रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अचानक पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सकाळची वेळ असल्याने जिवीतहानी टळली. शिवाय ग्रामस्थांच्या मदतीने घरातील विविध वस्तु सुरक्षित जागी ठेवता आल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. चिखले सरपंच अनिता कवटे यांच्या घरी, चिखले पोलीस चौकी आणि अन्य ग्रामस्थांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते.डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर झाई, बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे रस्त्ये वाहतूक ठप्प झाली. नोकरी-धंद्यानिमित्त पहाटे घरातून बाहेर पडलेले चाकरमानी ठिकठिकाणी अडकून पडले. सकाळी नऊ वाजेनंतर पावसाने उघडीप दिली. दुपारी दोन नंतर पाण्याची पातळी घटल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने वाहनांना मार्गस्थ करण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात तालुक्याला किमान दोन ते तीन वेळा पुराचा फटका बसून जनजीवन विस्कळीत होते.>डिजिटल इंडियाचा दावा फोल नागरिकांना जीवावर उदार होऊन स्व संरक्षण करावे लागले. डिजटल इंडियाचा दावा फोल ठरला असून आपत्कालीन परिस्थितीचा संदेश शासकीय यंत्रणेकडून गावपातळीपर्यंत पोहचलाच नाही. पावसामुळे सट्टी घ्यावी लागल्यामुळे नोकरदार वर्गामध्ये समिश्र प्रतिक्रि या व्यक्त होत होती. सोशल मीडियावर दिवसभर पावसाचे फोटो फिरत होते. त्यामुळे परिसरातील पुरिस्थतीची माहिती नागरिकांना मिळत होती.>भाताची उभी पिके आडवीआदिवासी पाडयावर अनेक घरात भातांची कणगी आणि गृहोपयोगी वस्तु भिजल्याने संसार रस्त्यावर आला आहे. किरण गजानन पाटील यांच्या शेतावरील सुमारे पंचवीस हजार किमतीचे ठिबकिसंचन साहित्य पुरात वाहून गेले असून विविध गावांमध्ये शेतातील उभी भात पिकं आडवी झाली.