शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

जेटीवर उभ्या असलेल्या तीन बोटी बुडाल्या

By admin | Updated: September 22, 2016 03:20 IST

तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून पुरिस्थतीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

डहाणू/बोर्डी : तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून पुरिस्थतीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर घरांमध्ये पाणी शिरले. डहाणू प्रमुख राज्य मार्ग पाण्याखाली गेल्याने रस्त्ये वाहतूक पुर्णपणे ठप्प होऊन नागरिक अनेक ठिकाणी अडकले होते. झाई समुद्रकिनारी जेटीवर उभ्या तीन बोटी पुरात बुडल्या असून, अन्य बोटींचे नुकसान झाले आहे. दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई समुद्रकिनारी जेटीवर सुमारे अडीचशे बोटी उभ्या होत्या. पुराच्या पाण्यामुळे त्या पैकी इंद्रउचद अण्णा माच्छी या बोटमालकांची साईरामप्रसाद, सुनीता चंद्रकांत माच्छी यांची जलाराम व झाई पुलनाजीक मांगेला मच्छीमार सोसायटीची एक बोट अश्या तीन बोटी बुडल्या असून बोटीतील साहित्य वाहून गेले. तर अन्य तीन बोटींचे नुकसान झाल्याने मासेमारी हंगामाला मुकणार असून मिच्छमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. डहाणू तालुक्यात २० व २१ सप्टेंबर या काळात एकूण ५२८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे पुरिस्थती येऊन, अनेक गावातील घरांमध्ये पाणी शिरले, रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अचानक पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सकाळची वेळ असल्याने जिवीतहानी टळली. शिवाय ग्रामस्थांच्या मदतीने घरातील विविध वस्तु सुरक्षित जागी ठेवता आल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. चिखले सरपंच अनिता कवटे यांच्या घरी, चिखले पोलीस चौकी आणि अन्य ग्रामस्थांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते.डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर झाई, बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे रस्त्ये वाहतूक ठप्प झाली. नोकरी-धंद्यानिमित्त पहाटे घरातून बाहेर पडलेले चाकरमानी ठिकठिकाणी अडकून पडले. सकाळी नऊ वाजेनंतर पावसाने उघडीप दिली. दुपारी दोन नंतर पाण्याची पातळी घटल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने वाहनांना मार्गस्थ करण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात तालुक्याला किमान दोन ते तीन वेळा पुराचा फटका बसून जनजीवन विस्कळीत होते.>डिजिटल इंडियाचा दावा फोल नागरिकांना जीवावर उदार होऊन स्व संरक्षण करावे लागले. डिजटल इंडियाचा दावा फोल ठरला असून आपत्कालीन परिस्थितीचा संदेश शासकीय यंत्रणेकडून गावपातळीपर्यंत पोहचलाच नाही. पावसामुळे सट्टी घ्यावी लागल्यामुळे नोकरदार वर्गामध्ये समिश्र प्रतिक्रि या व्यक्त होत होती. सोशल मीडियावर दिवसभर पावसाचे फोटो फिरत होते. त्यामुळे परिसरातील पुरिस्थतीची माहिती नागरिकांना मिळत होती.>भाताची उभी पिके आडवीआदिवासी पाडयावर अनेक घरात भातांची कणगी आणि गृहोपयोगी वस्तु भिजल्याने संसार रस्त्यावर आला आहे. किरण गजानन पाटील यांच्या शेतावरील सुमारे पंचवीस हजार किमतीचे ठिबकिसंचन साहित्य पुरात वाहून गेले असून विविध गावांमध्ये शेतातील उभी भात पिकं आडवी झाली.