शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

वायुबाधाप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: December 8, 2014 02:51 IST

वालधुनी नदीत टँकरमधून विषारी रसायने सोडल्याने नदी परिसरात राहणा-या नागरिकांना वायुबाधा झाली होती. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी शनिवारी दोघांना तर रविवारी आणखी तिघांना अटक केली.

अंबरनाथ : वालधुनी नदीत टँकरमधून विषारी रसायने सोडल्याने नदी परिसरात राहणा-या नागरिकांना वायुबाधा झाली होती. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी शनिवारी दोघांना तर रविवारी आणखी तिघांना अटक केली. वालधुनी नदीत रासायने सोडण्यात येत असल्यामुळे २९ नोव्हेंबरला ३८७ नागरिकांना वायुबाधा झाली होती. या प्रकरानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात टँकरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी शनिवारी टँकर चालक दीपक जैसवाल आणि टँकरमालक रमेश गुडरू यांना अटक केली. ही कारवाई झाल्यावर दुसऱ्याच दिवशी टँकरमालक राहुल शेठ आणि चालक रवींद्र रमेश पवार, आनंदराव गोरख पवार यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडील एमएच०६ बीडी २०२७ आणि एमएच ०६ बीडी १६६ हे दोन टँकरही ताब्यात घेतले आहे. हे तिघेही महाडचे रहिवासी आहेत. ज्या केमिकल कंपनीतून ही रसायने आणण्यात आली होती त्या कंपनीच्या मालकांना अद्याप अटक झालेली नाही. तसेच नदीत सोडलेले घातक रसायन कोणते होते याचीही माहिती मिळालेली नाही.दुसरीकडे २९ नोव्हेंबरला वालधुनी नदीत वायुबाधा झाल्यानंतर लगेचच ३ डिसेंबरला अंबरनाथच्याच गोविंद पुल परिसरातही रासायनिक कचरा टाकल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी वडोल गावातील बंटी तुकामार म्हात्रे याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता बंटीला जामिनावर सोडण्यात आले आले. वालधुनी नदीला प्रदुषणामुळे नाल्याचे रूप आले आहे. याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)