शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

साडेतीन हजार विद्यार्थिनी शिष्यवृत्तीपासून वंचित

By admin | Updated: December 27, 2016 22:30 IST

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व मुलींचे शाळांमधील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 27 - समाजातील मागास घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व मुलींचे शाळांमधील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. परंतु या योजनेपासून खासगी व मोठ्या शाळा विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेत नाही किंवा विद्यार्थ्यांनी भरलेल्या आॅनलाईन अर्जाला फारसे गंभीरतेने घेत नाही. परिणामी या योजनेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, शासनही या योजनेला घेऊन फारसे गंभीर नाही. निधी कमी मिळत असल्याने प्रलंबित पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. सध्याच्या स्थितीत नागपूर जिल्ह्यातील वर्ग आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या साडेतीन हजार पात्र विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून प्रत्येक शैक्षणिक वर्षात पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जाती अशा विद्यार्थिनीस ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तर समाज कल्याण विभागामार्फत इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय जातीतील विद्यार्थिंनीना १००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. सुरुवातीच्या काळात शाळांनी याला प्रतिसाद दिला नाही. यामुळे ही योजना रखडली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाईची तंबी दिल्यावर मुख्याध्यापकांनी समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठविणे सुरू केले. प्रस्ताव जमा करून शिष्यवृत्ती तत्काळ खात्यावर जमा करण्यात येऊ लागली. मात्र दरम्यानच्या काळात समाज कल्याण विभागाचे पुन्हा याकडे दुर्लक्ष झाले. विशेषत: खासगी शाळा व मोठ्या शाळांनी विद्यार्थिंनीचे आॅनलाईन अर्ज भरून देण्याकडे पाठ फिरवली. काही विद्यार्थिनींनी स्वत:हून आॅनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला, परंतु या अर्जात शाळेशी संबंधित माहिती माहीत नसल्याने अनेक विद्यार्थिंनीना अडचणी आल्या. त्यांनी या संदर्भात शाळांशी संपर्क साधला मात्र अनेकांच्या पदरी निराशा आली. याच कारणामुळे ही योजना केवळ ७० टक्केच यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.