शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शिक्षणसेवकांचे देऊळ पाण्यात!

By admin | Updated: December 10, 2014 00:01 IST

परीक्षेत पात्र ठरल्यानंतरही पाच वर्षांपासून नियुक्तीला ‘खो’.

सचिन राऊत/अकोला शिक्षणसेवकांच्या १५ हजार जागांसाठी पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २0१0 साली भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या राज्यातील ३ हजार १३९ शिक्षणसेवकांना परीक्षेत पात्र ठरल्यानंतरही नियुक्ती देण्यात येत नसून, शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे २ मे २0१0 रोजी शिक्षणसेवकांच्या राज्यातील १५ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेमध्ये १0 प्रश्न चुकीचे विचारण्यात आले होते. त्यामुळे काही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार १४ हजार उमेदवारांचे फेरमूल्यांकन करण्यात आले. या फेरमुल्यांकनानंतर राज्यातील ३ हजार १३९ उमेदवार शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरले; मात्र त्यांना २0१0 पासून नियुक्तीच देण्यात आलेली नाही. राज्य परीक्षा परिषदेव्दारा २0१0 मध्ये घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत तीन हजारावर शिक्षण सेवक पात्र ठरले. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मंजुर पदांपेक्षा जास्त शिक्षक आहेत. त्यामूळे या शिक्षकांचेच समायोजन करण्यास अडचणी येत असल्याची प्रतिक्रिया अकोला जिल्हापरिषदेचे शिक्षणाधिकारी ए. जे. सोनवने यांनी लोकमतशी बोलताना दिली. शिक्षकांना नियुक्ती दिल्यास अतिरिक्त शिक्षकांची वाढेल. याच कारणामूळे पात्र ठरलेल्या शिक्षण सेवकांना नियुक्ती देण्यास वेळ लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. *१८ वेळा आंदोलनंशिक्षणसेवक म्हणून पात्र ठरलेल्या ३ हजार १३९ शिक्षणसेवकांना पाच वर्षांपासून नियुक्ती न मिळाल्याने त्यांनी पाच वर्षात १८ वेळा धरणे, आंदोलनं व मोर्चे काढले आहेत; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड आदी जिल्ह्यांमध्ये ही आंदोलनं करण्यात आली होती. *दोघींनी केला आत्महत्येचा प्रयत्न शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. पात्र असतानाही नियुक्ती मिळत नसल्याने त्यापैकी दोन मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, हे उल्लेखनिय.