शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

हजारो शिक्षणसेवकांचे देऊळ पाण्यात!

By admin | Updated: December 10, 2014 00:01 IST

परीक्षेत पात्र ठरल्यानंतरही पाच वर्षांपासून नियुक्तीला ‘खो’.

सचिन राऊत/अकोला शिक्षणसेवकांच्या १५ हजार जागांसाठी पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २0१0 साली भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या राज्यातील ३ हजार १३९ शिक्षणसेवकांना परीक्षेत पात्र ठरल्यानंतरही नियुक्ती देण्यात येत नसून, शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे २ मे २0१0 रोजी शिक्षणसेवकांच्या राज्यातील १५ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेमध्ये १0 प्रश्न चुकीचे विचारण्यात आले होते. त्यामुळे काही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार १४ हजार उमेदवारांचे फेरमूल्यांकन करण्यात आले. या फेरमुल्यांकनानंतर राज्यातील ३ हजार १३९ उमेदवार शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरले; मात्र त्यांना २0१0 पासून नियुक्तीच देण्यात आलेली नाही. राज्य परीक्षा परिषदेव्दारा २0१0 मध्ये घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत तीन हजारावर शिक्षण सेवक पात्र ठरले. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मंजुर पदांपेक्षा जास्त शिक्षक आहेत. त्यामूळे या शिक्षकांचेच समायोजन करण्यास अडचणी येत असल्याची प्रतिक्रिया अकोला जिल्हापरिषदेचे शिक्षणाधिकारी ए. जे. सोनवने यांनी लोकमतशी बोलताना दिली. शिक्षकांना नियुक्ती दिल्यास अतिरिक्त शिक्षकांची वाढेल. याच कारणामूळे पात्र ठरलेल्या शिक्षण सेवकांना नियुक्ती देण्यास वेळ लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. *१८ वेळा आंदोलनंशिक्षणसेवक म्हणून पात्र ठरलेल्या ३ हजार १३९ शिक्षणसेवकांना पाच वर्षांपासून नियुक्ती न मिळाल्याने त्यांनी पाच वर्षात १८ वेळा धरणे, आंदोलनं व मोर्चे काढले आहेत; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड आदी जिल्ह्यांमध्ये ही आंदोलनं करण्यात आली होती. *दोघींनी केला आत्महत्येचा प्रयत्न शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. पात्र असतानाही नियुक्ती मिळत नसल्याने त्यापैकी दोन मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, हे उल्लेखनिय.