शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

ठाणे उद्यानात लाखोंचा गैरव्यवहार

By admin | Updated: May 15, 2014 04:26 IST

ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांच्या दुरवस्थेवर ‘उद्यानांची दैना’ या मालिकेद्वारे ‘लोकमत’ गेले १६ दिवस प्रकाश टाकला

जितेंद्र कालेकर, ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांच्या दुरवस्थेवर ‘उद्यानांची दैना’ या मालिकेद्वारे ‘लोकमत’ गेले १६ दिवस प्रकाश टाकत असतानाच महापालिकेच्या उद्यान विभागात करोडोंचा गैरव्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट महापालिकेच्या लेखापरीक्षकांनीच आपल्या २०१०- ११ या वर्षीच्या अहवालात केला असून, तो माहितीच्या अधिकाराद्वारे काही कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. जनमोर्चा या सामाजिक संस्थेने मिळविलेल्या माहितीद्वारे असे स्पष्ट झाले आहे की, उद्यान विभागातर्फे गेली अनेक वर्षे उद्यानांच्या केवळ निगा, देखभाल व खेळणी लावणे यावर करोडोंचा खर्च करण्यात आला असून, २०१०-२०११ या आर्थिक वर्षाच्या हिशेब तपासणीत याच संदर्भातील तब्बल ३० प्रकरणांच्या एक कोटी २० लाखांच्या कामांच्या फायलीच सादर झाल्या नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. जनमोर्चाचे संयोजक चंद्रहास तावडे यांनी माहिती अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार, उद्यानातील खेळणी आणि इतर सुविधांसाठी जितक्या रकमेची बिले सादर करून त्याची रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यापेक्षा प्रत्यक्षात फक्त २५ ते ३० टक्केच काम झाल्याचे आढळून येत आहे. त्याची योग्य ती नोंद वेळच्या वेळी नियमानुसार आवश्यक त्या रजिस्टरमध्ये ठेवण्यात आलेली नाही. यामुळे ही कामे सर्वप्रथम कधी करण्यात आली, नंतर ती कधी केली गेली, याची कोणतीही दर्शविणार्‍या फायलीच सादर केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे यापूर्वी हिरवळ आणि शोभेची झाडे लावण्याचे काम नेमके केव्हा करण्यात आले होते आणि त्याची निगा तसेच देखभाल कोणत्या मुदतीपर्यंत आहे, खेळणी कधी लावली, त्यांची दुरुस्ती, देखभाल कधी झाली, ती बदलली कधी याची माहितीही महापालिकेच्याच लेखापरीक्षण विभागाला उपलब्ध झालेली नाही. लेखापरीक्षण विभागाने उद्यान विभागाकडे २००९-२०१० या आर्थिक वर्षात केलेल्या खर्चाचा तपशील मागितला. मात्र या विभागाने लेखी आणि तोंडी याबाबतच्या फायली उपलब्ध करून देण्याची मागणी करूनही त्या संबंधितांनी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे ही कामे करणार्‍या ३० ठेकेदारांना अदा झालेल्या एक कोटी २० लाख ४७० रुपयांच्या खर्चाची अधिकृत कागदपत्रेच लेखापरीक्षणासाठी मिळालेली नाहीत. परिणामी त्यावर झालेला खर्च योग्य बाबीसाठी आणि सक्षम प्राधिकार्‍याच्या मान्यतेने आणि दिलेल्या मुदतीत झाला आहे तसेच काही अनियमितता झालेली नाही, याची खात्री करता आलेली नसल्याचा ठपका लेखापरीक्षकाने आपल्या अहवालात ठेवला आहे.