शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

स्वतंत्र विदर्भासाठी लढणार हजारो वकील

By admin | Updated: August 1, 2016 22:30 IST

स्वतंत्र विदर्भासाठी आता वकिलांनीही लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा वकील संघटनेतर्फे आयोजित चर्चासत्रामध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. १ -  स्वतंत्र विदर्भासाठी आता वकिलांनीही लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा वकील संघटनेतर्फे आयोजित चर्चासत्रामध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली.याप्रसंगी बोलताना अ‍ॅड. विनोद तिवारी म्हणाले, हा निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ घेण्यात आलेला नाही. वकील स्वत:च्या आवश्यकतेसाठी स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यात सहभागी होणार आहेत. ६०७ कायदेविषयक संहितांमधून २७७ संहितांमध्ये शासनाला अपील व पुनर्विचार अर्ज करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यासाठी वकिलांना वारंवार मुंबईला जावे लागते. नागपुरात अपिलीय अधिकाऱ्याचे कार्यालय स्थापन करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. गरजू पक्षकारांना मुंबईला जाण्याचा खर्च परवडत नाही. यामुळे त्यांना वेळेवर न्याय मिळत नाही. परिणामी असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत असे त्यांनी सांगितले.अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांनी स्वतंत्र विदर्भासाठी सप्टेंबरमध्ये विदर्भातील वकिलांचे महासंमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. संमेलनात ३० हजारावर वकील सहभागी होतील. एकट्या नागपूर जिल्ह्यातील सुमारे ५ हजार वकील उपस्थित राहण्याची शक्यता आहे असेही त्यांनी सांगितले.