शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

विवाहितेचे प्रियकरासोबत तिस-यांदा पलायन

By admin | Updated: July 29, 2016 11:37 IST

अहमदाबाद येथील युवकासोबत लग्न झालेल्या २0 वर्षीय विवाहितेने तिस-यांदा अकोल्यातील प्रियकरासोबत पलायन केले.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २९ -  अहमदाबाद येथील युवकासोबत लग्न झालेल्या २0 वर्षीय विवाहितेने तिस-यांदा अकोल्यातील प्रियकरासोबत पलायन केले. विवाहितेचा शोध घेत, तिचे माहेरकडील कुटूंबिय गुरूवारी अकोल्यात पोहोचले. कुटूंबियांनी विवाहितेला ताब्यात घेऊन सायंकाळी रामदासपेठ पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी प्रियकराचेही कुटूंब पोहोचल्या दोन्ही गटात चांगलाच वाद रंगला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. पोलिसांच्या डोळ्यांदेखतच दोन्ही कुटूंबातील महिला सदस्यांनी एकमेकांना मारहाण केली. 
 
अहमदाबाद येथील युवतीचे अकोल्यातील एका युवकासोबत सुत जुळले. दरम्यान ही बाब तिच्या कुटूंबियांना कळल्यानंतर त्यांनी तिच्या इच्छेविरूद्ध अहमदाबाद येथील एका युवकासोबत लग्न झाले. लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतरही प्रियकर व युवतीची एकमेकांना भेटायचे. पती आवडत नसल्याने आणि मनाविरूद्ध लग्न झाल्यामुळे युवतीने प्रियकरासोबत पलायन केले. कुटूंबियांनी युवतीला ताब्यात घेऊन अहमदाबादला आणले. काही दिवस उलटत नाही तो, दुसºयांदा युवतीने प्रियकरासोबत पलायन केले. महिनाभरानंतर कुटूंबियांनी युवतीला शोधून तिला घरी आणले. घरी आणून पंधरा दिवस होत नाही. तोच, पुन्हा युवतीने तिस-यांदा आपल्या प्रियकरासोबत पलायन केले आणि थेट अकोला गाठले. कुटूंबियांना ही बाब माहिती पडताच, त्यांनीही गुरूवारी दुपारी अकोला गाठले आणि प्रियकराच्या ताब्यातून तिला सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने प्रियकराच्या कुटूंबासमवेत रामदासपेठ पोलीस ठाणे गाठले आणि कुटूंबियांविरूद्ध तक्रार देण्याची तयारी केली. याठिकाणी युवतीचेही कुटूंबिय पोहोचले. कुटूंबातील सदस्य तिची समजूत घालत असताना, युवतीने कुटूंबियांनी माझ्या इच्छेविरूद्ध लग्न केले. मला मुलगा पसंत नाही. मी त्याच्याकडे जात नाही. प्रियकराकडे राहण्याचा निर्णय तिने पोलिसांना सांगितला. युवती हाताबाहेर जात असल्याचे कुटूंबियांनी तिला जबरदस्ती केली. यामध्ये प्रियकराच्या कुटूंबातील सदस्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही गटात शाब्दीक वाद सुरू झाला आणि पोलिसांच्या डोळ्यांदेखतच त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी काही सदस्यांना ताब्यात चांगलाच चोप दिला. रात्री उशिरापर्यंत पोलीस दोन्ही कुटूंबांचे म्हणणे ऐकून घेत होते. दोन्ही कुटूंबियांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलीस निर्णय घेतील. (प्रतिनिधी)