शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

विवाहितेचे प्रियकरासोबत तिस-यांदा पलायन

By admin | Updated: July 29, 2016 11:37 IST

अहमदाबाद येथील युवकासोबत लग्न झालेल्या २0 वर्षीय विवाहितेने तिस-यांदा अकोल्यातील प्रियकरासोबत पलायन केले.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २९ -  अहमदाबाद येथील युवकासोबत लग्न झालेल्या २0 वर्षीय विवाहितेने तिस-यांदा अकोल्यातील प्रियकरासोबत पलायन केले. विवाहितेचा शोध घेत, तिचे माहेरकडील कुटूंबिय गुरूवारी अकोल्यात पोहोचले. कुटूंबियांनी विवाहितेला ताब्यात घेऊन सायंकाळी रामदासपेठ पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी प्रियकराचेही कुटूंब पोहोचल्या दोन्ही गटात चांगलाच वाद रंगला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. पोलिसांच्या डोळ्यांदेखतच दोन्ही कुटूंबातील महिला सदस्यांनी एकमेकांना मारहाण केली. 
 
अहमदाबाद येथील युवतीचे अकोल्यातील एका युवकासोबत सुत जुळले. दरम्यान ही बाब तिच्या कुटूंबियांना कळल्यानंतर त्यांनी तिच्या इच्छेविरूद्ध अहमदाबाद येथील एका युवकासोबत लग्न झाले. लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतरही प्रियकर व युवतीची एकमेकांना भेटायचे. पती आवडत नसल्याने आणि मनाविरूद्ध लग्न झाल्यामुळे युवतीने प्रियकरासोबत पलायन केले. कुटूंबियांनी युवतीला ताब्यात घेऊन अहमदाबादला आणले. काही दिवस उलटत नाही तो, दुसºयांदा युवतीने प्रियकरासोबत पलायन केले. महिनाभरानंतर कुटूंबियांनी युवतीला शोधून तिला घरी आणले. घरी आणून पंधरा दिवस होत नाही. तोच, पुन्हा युवतीने तिस-यांदा आपल्या प्रियकरासोबत पलायन केले आणि थेट अकोला गाठले. कुटूंबियांना ही बाब माहिती पडताच, त्यांनीही गुरूवारी दुपारी अकोला गाठले आणि प्रियकराच्या ताब्यातून तिला सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने प्रियकराच्या कुटूंबासमवेत रामदासपेठ पोलीस ठाणे गाठले आणि कुटूंबियांविरूद्ध तक्रार देण्याची तयारी केली. याठिकाणी युवतीचेही कुटूंबिय पोहोचले. कुटूंबातील सदस्य तिची समजूत घालत असताना, युवतीने कुटूंबियांनी माझ्या इच्छेविरूद्ध लग्न केले. मला मुलगा पसंत नाही. मी त्याच्याकडे जात नाही. प्रियकराकडे राहण्याचा निर्णय तिने पोलिसांना सांगितला. युवती हाताबाहेर जात असल्याचे कुटूंबियांनी तिला जबरदस्ती केली. यामध्ये प्रियकराच्या कुटूंबातील सदस्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही गटात शाब्दीक वाद सुरू झाला आणि पोलिसांच्या डोळ्यांदेखतच त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी काही सदस्यांना ताब्यात चांगलाच चोप दिला. रात्री उशिरापर्यंत पोलीस दोन्ही कुटूंबांचे म्हणणे ऐकून घेत होते. दोन्ही कुटूंबियांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलीस निर्णय घेतील. (प्रतिनिधी)