शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

‘ते’ १४ कोटी परत गेले !

By admin | Updated: December 8, 2014 02:33 IST

गारपीटग्रस्त शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असताना प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वाट्याचा तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे.

अहमदनगर : गारपीटग्रस्त शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असताना प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वाट्याचा तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे. पाच तालुक्यांना तर नऊ महिन्यानंतर शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहिल्याचा साक्षात्कार झाल्याने त्यांच्याकडून पुन्हा निधीची मागणी करण्यात आली आहे़ शासनाने खरिपाची ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांना कर्ज वसुली व वीज बिलात माफी दिली़ नगर जिल्ह्यात खरिपाची ५० पेक्षा कमी पैसेवारी असणारी ३०५ गावे आहेत़ या गावांतील शेतकऱ्यांना संबंधित सवलतीही लागू झाल्या़ परंतु मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पाऊस झाला़ गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ त्यासाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर केली़ त्यानुसार गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी १४८ कोटी २० लाख रुपये प्रशासनास प्राप्त झाले़ जिल्हा प्रशासनाने चार टप्प्यांत हा निधी तहसील कार्यालयाकडे वर्ग केला़ तहसील कार्यालयाने तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून नियमानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे अपेक्षित होते़ परंतु तहसील कार्यालयाने हात आखडता घेतला़ त्यामुळे तहसील कार्यालयाची तिजोरी पैशांनी भरली खरी पण शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलीच नाही़ आर्थिक मदत मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी मोर्चे व आंदोलने केली़ अनेक शेतकरी गारपिटीच्या आर्थिक मदतीपासून वंचित असल्याचे उघड झाल्याने तालुका प्रशासनाने पुन्हा शोध सुरू केला़ त्यात पाच तालुक्यांत गारपिटीमुळे नुकसान झालेले २ हजार ४०० शेतकरी निधीपासून वंचित राहिल्याचे आढळले. त्यांच्यासाठी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी पुन्हा मागण्यात आला. जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळाली. लाभापासून बहुतांश तालुक्यातील शेतकरी अजूनही वंचित असल्याने मदतीची मागणी होत आहे़शासनाकडून १४८ कोटी २० लाख रुपये प्राप्त झाले़ यापैकी चार टप्प्यांत १२६ कोटी २७ लाख वितरीत केले गेले़ मात्र तहसील कार्यालयांनी २१ कोटी ७९ लाख रुपये जिल्हा प्रशासनास परत केले़ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून गारपिटीसाठी दिलेला निधी परत गेला. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांकडून निधीची मागणी होत असतानाच निधी परत का पाठविला, असा सवाल शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)