शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

पाचव्या, सहाव्या रेल्वेमार्गातील वृक्षांचे अडथळे होणार दूर

By admin | Updated: December 6, 2015 01:13 IST

मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या आड असलेल्या १४७ वृक्षांचे सर्वेक्षण करून योग्य त्या कारवाईसाठी यासंदर्भातील प्रस्ताव येत्या वृक्ष

ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या आड असलेल्या १४७ वृक्षांचे सर्वेक्षण करून योग्य त्या कारवाईसाठी यासंदर्भातील प्रस्ताव येत्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्याची हमी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिली. मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण या मार्गावर पाचवा आणि सहावा रेल्वेमार्ग टाकण्याचे काम प्रदीर्घ काळापासून रखडले आहे. कुर्ला ते ठाणे या टप्प्याचे काम पूर्ण झाले असले तरी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला या टप्प्यातील काम अद्याप सुरूच झालेले नाही. तर, ठाणे ते दिवा या टप्प्यातील कामापुढे झाडांचा अडथळा निर्माण झाला आहे. रेल्वेतील गर्दीमुळे या मार्गावर रेल्वेचे वारंवार अपघात होऊन प्रवाशांना जीव गमवावे लागत असल्याची गंभीर दखल घेऊन खासदार शिंदेंनी शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. दिव्याशी संबंधित अनेक समस्यांविषयीही या वेळी चर्चा झाली. रेल्वेकडून सर्व तयारी असून केवळ महापालिकेकडून झाडांबाबत परवानगी मिळत नसल्यामुळे काम रखडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यावर, आयुक्तांनी तत्काळ सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दिवा स्थानकानजीकचे रेल्वे फाटक बंद करण्यासाठी तेथे उड्डाणपूल उभा करण्याच्या कामातही ठाणे महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याची बाब त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणली. पूर्वेला हा आरओबी जिथे उतरणार आहे, त्या ठिकाणची काही बांधकामे हटवावी लागणार असून त्यांचे योग्य ते पुनर्वसन करून आवश्यक ती कारवाई ठाणे महापालिकेने त्वरित सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यालाही आयुक्तांनी मंजुरी दिली असून स्वत: या कामी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. महापौर संजय मोरे यांनीही रहिवाशांची भेट घेऊन या प्रश्नातून तोडगा काढण्याची ग्वाही दिली.दिवा-शीळ मार्गासाठी ३ कोटी मंजूरदिवा येथे जाण्यासाठी एकमेव मार्ग असलेल्या दिवा-शीळ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या डागडुजीसाठी बैठकीत चर्चा झाली असता या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी आयुक्तांनी ३ कोटी रु पये मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.