शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

राज्यभरातील २२८ लाचखोरांचे निलंबन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 02:04 IST

मुंबईसह ठाणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नांदेड येथील परिस्थिती

मुंबई : लाचखोरीच्या जाळ्यात अडकूनही राज्यभरात २२८ जणांचे निलंबन अद्याप झालेले नाही. यात ग्रामविकास आणि शिक्षण व क्रीडा विभागातील सर्वाधिक लाचखोरांचा समावेश आहे. एकीकडे दोषसिद्धीचे प्रमाण कमी असताना, प्रशासनाकड़ून अशा प्रकारे लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाठराखण केली जात असल्याने लाचखोरीला आणखी बळ मिळत आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून लाचखोरांविरुद्ध कारवाई केली. यापैकी मुंबई (२५), ठाणे (१४), पुणे (१६), नागपूर (५१) , नाशिक (४), अमरावती (२४), औरंगाबाद (३९), नांदेड (५५) येथील परिक्षेत्रात कारवाई केलेल्या लाचखोरांचे अद्याप निलंबन करण्यात आलेले नाही. एसीबीने जारी कलेल्या आकडेवारीनुसार, यात इतर ६२ लोकसेवकांसह प्रथम श्रेणी वर्गातील २८, द्वितीय २९, चतुर्थ ७, तर सर्वाधिक तृतीय श्रेणीतील १०२ जणांचा समावेश आहे.ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद/ पंचायत समितीमधील ४८, शिक्षण व क्रीडा विभागातील ४६ त्यापाठोपाठ महसूल/नोंदणी, भूमिअभिलेखमधील ३० जणांचा समावेश आहे. यातच पोलीस, कारागृह आणि होमगार्ड विभागातील १५ जण लाचखोरीच्या गुन्ह्यांत अटक होऊनही अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही.यात २०१३पासून ते आतापर्यंत केलेल्या सापळा कारवाईतील हे आरोपी आहेत. यातील बरीचशी प्रकरणे ही २०१८ची आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कृपाशीर्वादामुळे लाचखोरीमध्ये पकडली गेलेली ही मंडळी अजूनही प्रशासनाच्या पटलावर आहेत.लाचखोरीची ३६२ कारवाईएसीबीने जानेवारी ते ९ आॅगस्टपर्यंत ३६२ सापळा कारवाई केली आहे. यात ५०४ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. गेल्या वर्षी हाच आकडा ५३८ सापळा कारवाईत ७१८ जणांवर कारवाई करण्यात आली होती.