शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

राज्यभरातील २२८ लाचखोरांचे निलंबन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 02:04 IST

मुंबईसह ठाणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नांदेड येथील परिस्थिती

मुंबई : लाचखोरीच्या जाळ्यात अडकूनही राज्यभरात २२८ जणांचे निलंबन अद्याप झालेले नाही. यात ग्रामविकास आणि शिक्षण व क्रीडा विभागातील सर्वाधिक लाचखोरांचा समावेश आहे. एकीकडे दोषसिद्धीचे प्रमाण कमी असताना, प्रशासनाकड़ून अशा प्रकारे लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाठराखण केली जात असल्याने लाचखोरीला आणखी बळ मिळत आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून लाचखोरांविरुद्ध कारवाई केली. यापैकी मुंबई (२५), ठाणे (१४), पुणे (१६), नागपूर (५१) , नाशिक (४), अमरावती (२४), औरंगाबाद (३९), नांदेड (५५) येथील परिक्षेत्रात कारवाई केलेल्या लाचखोरांचे अद्याप निलंबन करण्यात आलेले नाही. एसीबीने जारी कलेल्या आकडेवारीनुसार, यात इतर ६२ लोकसेवकांसह प्रथम श्रेणी वर्गातील २८, द्वितीय २९, चतुर्थ ७, तर सर्वाधिक तृतीय श्रेणीतील १०२ जणांचा समावेश आहे.ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद/ पंचायत समितीमधील ४८, शिक्षण व क्रीडा विभागातील ४६ त्यापाठोपाठ महसूल/नोंदणी, भूमिअभिलेखमधील ३० जणांचा समावेश आहे. यातच पोलीस, कारागृह आणि होमगार्ड विभागातील १५ जण लाचखोरीच्या गुन्ह्यांत अटक होऊनही अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही.यात २०१३पासून ते आतापर्यंत केलेल्या सापळा कारवाईतील हे आरोपी आहेत. यातील बरीचशी प्रकरणे ही २०१८ची आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कृपाशीर्वादामुळे लाचखोरीमध्ये पकडली गेलेली ही मंडळी अजूनही प्रशासनाच्या पटलावर आहेत.लाचखोरीची ३६२ कारवाईएसीबीने जानेवारी ते ९ आॅगस्टपर्यंत ३६२ सापळा कारवाई केली आहे. यात ५०४ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. गेल्या वर्षी हाच आकडा ५३८ सापळा कारवाईत ७१८ जणांवर कारवाई करण्यात आली होती.