शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

हद्दीच्या वादावर तोडगा नाहीच

By admin | Updated: September 5, 2016 03:15 IST

पालघर-वसई, उत्तन मच्छीमारांमधील समुद्रातील हद्दीसंदर्भात संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कायदा बनवण्याचे आदेश दिले

पालघर : पालघर-वसई, उत्तन मच्छीमारांमधील समुद्रातील हद्दीसंदर्भात संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कायदा बनवण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पोटापाण्याच्या या प्रश्नाने आता टोकाची भूमिका घेण्याची वेळ मच्छीमारांवर ओढवली असून त्यामुळे समुद्रात कधीही रक्तरंजित संघर्ष उद्भवू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.पालघर, डहाणू तालुक्यांतील मच्छीमार रूढी-परंपरेप्रमाणे कव आणि दालदा या पारंपरिक पद्धतीने आपापल्या क्षेत्रात मासेमारी करीत आले असताना त्यांच्या क्षेत्रात वसई, उत्तन येथील मच्छीमारांनी बेकायदेशीररीत्या आपल्या कवी(खुंटे) मारून अतिक्र मण केले होते. यासंदर्भात सन २००३ मध्ये वादंग निर्माण झाल्यानंतर माजी केंद्रीय पेट्रोलियममंत्री आणि उत्तर प्रदेशचे विद्यमान राज्यपाल राम नाईक आणि तत्कालीन आमदार तसेच विद्यमान पालकमंत्री विष्णू सवरा यांनी याबाबत सामंजस्याने तोडगा निघावा, यासाठी प्रयत्न केले होते. त्या वेळचे ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी इकबालसिंग चहल यांच्यासमवेत झालेल्या अनेक सभांनंतर पालघर आणि डहाणू तालुक्याच्या हद्दीतील ४२.५ नॉटिकल सागरी मैलापुढील कवी काढून टाकण्याबाबत निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात वसई, उत्तन येथील मच्छीमारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत स्थगिती आदेश मिळवला होता. यादरम्यान, महाराष्ट्र सरकारने कायदा बनवावा म्हणून आदेश पारित केले होते. त्यानंतर, सागरी जिल्हा सल्लागार समितीने कव, दालंदा मासेमारीबाबत नियमावलीही तयार केल्याचे समितीचे सदस्य सुभाष तामोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>संघर्ष टोकाला जाणारपालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ३ आॅगस्ट रोजी पालघर, डहाणू, वसई, उत्तन भागातील मच्छीमार प्रतिनिधींची बैठक घेऊन यासंदर्भात तातडीने उपाययोजना आखून योग्य निर्णय होईपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना केल्या होत्या. उत्तन आणि वसई भागातील कव मच्छीमारांनी सातपाटी आणि डहाणू भागातील मच्छीमारांना त्यांच्याच भागात येऊन शिवीगाळ, दमदाटी करून दहशत निर्माण केल्याची आणि डहाणूतील मच्छीमारांची वागरा जाळीही चोरून नेल्याची तक्र ार सातपाटीच्या मच्छीमारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करून ऐन मासेमारी हंगामात दालंदा व वागरा मासेमारी क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, अन्यथा आमचा उदरनिर्वाह आणि रोजीरोटीच्या प्रश्नांसाठी आंदोलन उभारून उपोषणाचा मार्गही उभारावा लागेल, असा गर्भित इशारा सातपाटी मच्छीमार आणि सर्वोदय सहकारी संस्थेने दिला आहे.