शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

वर्ष उलटूनही रेशनकार्ड नाही

By admin | Updated: May 14, 2014 05:53 IST

वर्ष, दीड वर्षे उलटूनही रेशनकार्ड न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी निगडीच्या ‘अ’ परिमंडळ कार्यालयाचे अधिकारी विठ्ठल जाधव यांना घेराव घातला. गोंधळामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले.

पिंपरी : वर्ष, दीड वर्षे उलटूनही रेशनकार्ड न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी निगडीच्या ‘अ’ परिमंडळ कार्यालयाचे अधिकारी विठ्ठल जाधव यांना घेराव घातला. गोंधळामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. शेवटी नमते घेत अधिकार्‍यांनी १० जूनपर्यंत रेशनकार्ड देण्याचे लेखी कबूल केल्याने नागरिक शांत झाले. साईनाथनगर, निगडी येथील अधिकृत महा ई-सेवा केंद्रात सुमारे १०० नागरिकांनी रेशनकार्ड नवीन काढणे, विभक्त करणे व नूतनीकरणासाठी अर्ज केले होते. गेल्या वर्षी २३ मार्चपर्यत २२ जणांनी, जानेवारी महिन्यात ६६ व मार्च महिन्यात २१ जणांचे अर्ज आहेत. या कामास ३० दिवसांची मुदत असताना त्यास वर्ष, दीड वर्षे लागत असल्याने संतप्त नागरिक सेवा केंद्रचालकास धारेवर धरत होते. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता त्यांना घाम फुटत होता. या संदर्भात त्यांनी परिमंडल अधिकारी विठ्ठल जाधव यांना ३ ते ४ वेळा भेटून काम करण्याची विनंती केली. मात्र, रेशनकार्ड उपलब्ध नाहीत, मनुष्यबळ कमी आहे, निवडणुकीचे काम सुरू आहे, अन्नधान्य सुरक्षा योजनाचे शिक्के मारण्याचे काम सुरू आहे, अशी विविध उत्तरे देऊन त्यांची बोळवण करीत होते, असे केंद्रचालक रोहित टेकवडे व नागरिकांनी सांगितले. मात्र, एजंटास दोन हजार रुपये दिल्यास तो एका दिवसात रेशनकार्डचे काम करीत होता. याचा टेकवडे यांनी स्वत: अनुभव घेतला. त्यामुळे त्यांनी आज अर्जदार नागरिकांना बोलावून घेऊन दुपारी साडेतीनच्या सुमारास जाधव यांना कार्यालयात घेराव घातला. संतप्त नागरिकांनी जाधव यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. एजंटांचे काम एका दिवसात होते, तर रीतसर अधिकृत केंद्रातून अर्ज करूनही काम का होत नाही, असे विचारत गोंधळ घातला. गोंधळ वाढल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. नागरिकांच्या रोषापुढे नमते घेत जाधव यांनी पुढील महिन्यात १० तारखेस सर्व अर्जदारांचे रेशनकार्ड बनवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नागरिक शांत झाले. निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील यांनी सांगितले, ‘‘अर्ज आलेल्या तारखेप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून कामे करण्याची सूचना केली आहे. रीतसर आलेल्या नागरिकांची कामे केली जावीत. कामासाठी पैसे मागणार्‍या एजंटवर कारवाई करण्यात येणार आहे. एजंट पैसे मागत असल्यास निगडी पोलिसांशी संपर्क साधावा. सरकारी कामात अडथळा आणणार्‍या एजंटबाबत तक्रार दिल्यास त्वरित कारवाई केली जाईल. केवळ पत्र देऊन हा प्रश्न सुटणार नाही.’’ (प्रतिनिधी)