शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष उलटूनही रेशनकार्ड नाही

By admin | Updated: May 14, 2014 05:53 IST

वर्ष, दीड वर्षे उलटूनही रेशनकार्ड न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी निगडीच्या ‘अ’ परिमंडळ कार्यालयाचे अधिकारी विठ्ठल जाधव यांना घेराव घातला. गोंधळामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले.

पिंपरी : वर्ष, दीड वर्षे उलटूनही रेशनकार्ड न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी निगडीच्या ‘अ’ परिमंडळ कार्यालयाचे अधिकारी विठ्ठल जाधव यांना घेराव घातला. गोंधळामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. शेवटी नमते घेत अधिकार्‍यांनी १० जूनपर्यंत रेशनकार्ड देण्याचे लेखी कबूल केल्याने नागरिक शांत झाले. साईनाथनगर, निगडी येथील अधिकृत महा ई-सेवा केंद्रात सुमारे १०० नागरिकांनी रेशनकार्ड नवीन काढणे, विभक्त करणे व नूतनीकरणासाठी अर्ज केले होते. गेल्या वर्षी २३ मार्चपर्यत २२ जणांनी, जानेवारी महिन्यात ६६ व मार्च महिन्यात २१ जणांचे अर्ज आहेत. या कामास ३० दिवसांची मुदत असताना त्यास वर्ष, दीड वर्षे लागत असल्याने संतप्त नागरिक सेवा केंद्रचालकास धारेवर धरत होते. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता त्यांना घाम फुटत होता. या संदर्भात त्यांनी परिमंडल अधिकारी विठ्ठल जाधव यांना ३ ते ४ वेळा भेटून काम करण्याची विनंती केली. मात्र, रेशनकार्ड उपलब्ध नाहीत, मनुष्यबळ कमी आहे, निवडणुकीचे काम सुरू आहे, अन्नधान्य सुरक्षा योजनाचे शिक्के मारण्याचे काम सुरू आहे, अशी विविध उत्तरे देऊन त्यांची बोळवण करीत होते, असे केंद्रचालक रोहित टेकवडे व नागरिकांनी सांगितले. मात्र, एजंटास दोन हजार रुपये दिल्यास तो एका दिवसात रेशनकार्डचे काम करीत होता. याचा टेकवडे यांनी स्वत: अनुभव घेतला. त्यामुळे त्यांनी आज अर्जदार नागरिकांना बोलावून घेऊन दुपारी साडेतीनच्या सुमारास जाधव यांना कार्यालयात घेराव घातला. संतप्त नागरिकांनी जाधव यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. एजंटांचे काम एका दिवसात होते, तर रीतसर अधिकृत केंद्रातून अर्ज करूनही काम का होत नाही, असे विचारत गोंधळ घातला. गोंधळ वाढल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. नागरिकांच्या रोषापुढे नमते घेत जाधव यांनी पुढील महिन्यात १० तारखेस सर्व अर्जदारांचे रेशनकार्ड बनवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नागरिक शांत झाले. निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील यांनी सांगितले, ‘‘अर्ज आलेल्या तारखेप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून कामे करण्याची सूचना केली आहे. रीतसर आलेल्या नागरिकांची कामे केली जावीत. कामासाठी पैसे मागणार्‍या एजंटवर कारवाई करण्यात येणार आहे. एजंट पैसे मागत असल्यास निगडी पोलिसांशी संपर्क साधावा. सरकारी कामात अडथळा आणणार्‍या एजंटबाबत तक्रार दिल्यास त्वरित कारवाई केली जाईल. केवळ पत्र देऊन हा प्रश्न सुटणार नाही.’’ (प्रतिनिधी)