शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जाणीव-नेणिवेतही माध्यमांतर होणे गरजेचे

By admin | Updated: September 22, 2014 02:50 IST

शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘फँड्री’ यासारख्या चित्रनाट्य कलाकृतींमुळे दलित वास्तवाचे माध्यमांतर झाले.

मुंबई : ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘फँड्री’ यासारख्या चित्रनाट्य कलाकृतींमुळे दलित वास्तवाचे माध्यमांतर झाले. तरी ते अपूर्ण असून ते चित्रकला, शिल्पकला, संगीत अशा सर्व कला प्रकारांत प्रतिबिंबित होतानाच ते आपल्या जाणीव-नेणिवेतही पाझरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.कवी लोकनाथ यशवंत आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना शनिवारी पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ुयावेळी मंजुळे बोलत होते. पाच हजार रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदाचे १८ वे वर्ष होते. ज्येष्ठ साहित्यिक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शाहीर संभाजी भगत, लेखिका ऊर्मिला पवार, पत्रकार युवराज मोहिते आणि दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार व्यासपीठावर उपस्थित होते.कविता लहान कलाकृती आहे. पण तीच सर्वाधिक ज्वालाग्रही असते. मराठीत बहिणाबाई चौधरी महान कवयित्री असून, त्यांच्या काव्याचा आपल्यावर प्रभाव आहे. माझी कविता विदर्भातील आहे. मी अकरावी फेल आहे, मात्र राज्यातल्या सर्वच विद्यापीठांत माझी कविता अभ्यासली जात असून तिच्यावर चित्रपट, नाटक येत असल्याने माझ्या कवितेचेही माध्यमांतरच झाल्याचे कवी लोकनाथ यशवंत यांनी सांगितले.अध्यक्षीय मनोगतात लक्ष्मण गायकवाड म्हणाले, की ज्या वडार समाजाने आजवर येथे अनेक मंदिरे बांधली, देवाच्या मूर्ती घडवल्या, परंतु ‘फँड्री’सारख्या भेदक वास्तवतेने त्याच वडार समाजाचा नागराज मंजुळे ही दांभिकता फोडायला निघाला आहे.मला माझा मेसेज देता आला पाहिजे, अशी माझी कोणताही कलाप्रकार हाताळताना पूर्वअट असते अन्यथा मी त्या फंदात पडत नाही. त्यामुळेच मी मुळात शाहीर असूनही ‘शिवाजी अंडरग्राउंड’ किंवा ‘मुंबई १७’ अशा नाट्यकृती निर्माण करू शकल्याचे शाहीर संभाजी भगत म्हणाले.अख्ख्या देशाचा मालक अंबानी व्हावा़ तसे झाल्यास जाती, वर्ग संपुष्टात येतील. गरीब-श्रीमंत भेद मिटून जाईल. सारी माणसे एका रांगेत येतील, असा उपहासात्मक टोला लगावत गेल्या साठ वर्षांत भटक्या विमुक्तांच्या आर्थिक जीवनात काडीचेही माध्यमांतर झाले नसल्याचे साहित्यिक लक्ष्मण गायकवाड परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले. (प्रतिनिधी)