शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

...तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसू

By admin | Updated: July 12, 2017 04:49 IST

नेवाळीतील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी लवकरच जेलभरो आंदोलन करू.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीतील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी लवकरच जेलभरो आंदोलन करू. त्याउपरही सरकारला जाग आली नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यात घुसून तेथेच ठाण मांडू, असा इशारा शेतकरी सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांनी मंगळवारी दिला आहे. शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने १० जुलैपासून राज्यभरात ‘जनजागरण यात्रा’ काढण्यात आली आहे. नाशिकहून निघालेली ही यात्रा ठाणे जिल्ह्यात आली असल्याने समितीने नेवाळीतील शेतकऱ्यांची भेट घेतली. समितीचे निमंत्रक डॉ. नवले यांच्यासह पदाधिकारी नामदेव गावडे, मधुकर पाटील, सुशिला मोराळे, किसन गुजर आणि खंडू वाघचौरे यांनी भाल गावातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. या वेळी संजय चिकणकर, संतोष केणे, काळू कोमास्कर, गणेश म्हात्रे आदी पदाधिकारी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित होते. ब्रिटीश काळात नेवाळीतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. त्या परत केलेल्या नाहीत. नेवाळीतील शेतकऱ्यांचा लढा मोठा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संयम ठेवावा लागेल. ब्रिटीश सरकारची नीती ‘फोडा आणि झोडा’ ही होती. केंद्र व राज्य सरकार त्याचाच अवलंब करीत असल्याचा आरोप नवले यांनी केला. नेवाळीतील शेतकरी स्वातंत्र्यानंतरही त्याच्या शेतजमिनीसाठी लढा देत असल्याने, तो खऱ्या आजही पारतंत्र्यात जगत असल्याचे नवले म्हणाले. सरकार पोलीस व शेतकऱ्यांना भिडवून देते. पोलीस हादेखील शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने खऱ्या अर्थाने सरकारने दोन भावांमध्ये भांडण लावून दिल्याचा आरोपही नवले यांनी केला.सुकाणू समितीचे पदाधिकारी गावडे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने २०१३ साली भूसंपादनाचा कायदा आणला. या कायद्यानुसार अन्नधान्य पिकवित असलेली जमीन सरकार शेतकऱ्यांची ७० टक्के सहमती असल्याशिवाय संपादित करू शकत नाही. नेवाळीतील जमीन घेण्यास शंभर टक्के शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या कायद्यानुसारही सरकारची बाजू चुकीची आहे. या लढ्यात सुकाणू समिती व समितीला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या ३२ संघटना ‘नेवाळी जमीन बचाव आंदोलन समिती’च्या बाजूने उभ्या राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. सुकाणू समितीच्या ‘जनजागरण यात्रे’चा समारोप पुण्यात होणार आहे. त्या ठिकाणी नेवाळीतील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी यावे, असे आमंत्रण पदाधिकाऱ्यांनी दिले. समृद्धी मार्गाला विरोध करणारे विश्वनाथ पाटील यांनी नेवाळीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. नेवाळीतील शेतकऱ्यांचा संघर्ष यशस्वी ठरल्यावर, याच परिसरात विजयोत्सवाची समितीच्या वतीने सभा घेतली जाईल, असेही नवले यांनी स्पष्ट केले. >शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा - डॉ. अजित नवलेविक्रमगड : मंगळवारी विक्रमगडमध्ये कुणबी सेना, माकप व सुकाणू समितीने एकत्र येऊन निर्धार मेळावा घेतला. या वेळी समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन, सातबारा कोरा, नाहीतर सरकारची सरसकट उचलबांगडी करा, अशी हाक शेतकरी बांधवांना दिली. या वेळी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सरकार भांडवलदारानांच पोसतेय, असे सांगत शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याची टीका केली. मेळाव्यासाठी सुकाणू समितीचे सदस्य सुशिला मोराले (मराठवाडा), ज्योत्स्ना विसपुते (जळगाव), माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, कॉ़ अशोक ढवळे, छावा संघटनेचे करण गायकर, कॉ़ मधुकर पाटील, कॉ.किसन गुजर, नामदेव गावडे, राजा गहला, किरण गहला आदी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यासाठी शासनाने ५ टक्केही कर्जमाफी दिलेली नाही, यावरही या वेळी प्रकाशझोत टाकण्यात आला.