शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

...तर गणपतीत ‘काम बंद’चा चालकांचा इशारा

By admin | Updated: July 1, 2015 00:09 IST

एसटी महामंडळात तीन वर्षांपूर्वी भरती झालेल्या कनिष्ठ चालकांना त्यांच्या मूळ विभागात अद्यापही रुजू न केल्याने त्याच्या निषेध करीत ७२७ चालकांनी मंगळवारी मोर्चा काढला.

मुंबई : एसटी महामंडळात तीन वर्षांपूर्वी भरती झालेल्या कनिष्ठ चालकांना त्यांच्या मूळ विभागात अद्यापही रुजू न केल्याने त्याच्या निषेध करीत ७२७ चालकांनी मंगळवारी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केले. चालकांना मूळ विभागात रुजू न केल्यास गणेशोत्सव काळात काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. परळ कामगार मैदान ते मुंबई सेंट्रल असा हा मोर्चा काढण्यात आला.एसटी महामंडळाने २0१२ साली चालक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही भरती त्या त्या विभागांकरिता होती. यात नगर, लातूर, सोलापूर, अमरावती, सातारा, धुळे, नाशिकमधील चालकांचा समावेश होता. २0१२ साली चालकांची भरती झाल्यानंतर २0१४ साली या चालकांची बदली चालकांची टंचाई असलेल्या मुंबई व कोकण विभागात करण्यात आली. त्यानंतर या चालकांना त्यांच्या विभागात पुन्हा रुजू करण्यात आले नाही. चालकांची कधीही राज्याकरिता भरती झालेली नाही. तसेच यातील कोणत्याही चालकाने मुंबई किंवा कोकणात नोकरी मिळावी, असा अर्ज केलेला नाही. असे असतानाही महामंडळाचे अधिकारी चालकांना दिलेली नेमणूक बरोबर असल्याचा कांगावा करीत असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून सांगण्यात आले. महामंडळाच्या या कारभारामुळे ७२७ चालकांवर अन्याय झाला असून, ते भरती झालेल्या मूळ विभागात त्वरित बदली करावी, अशी मागणी युनियनकडून एसटी महामंडळाकडे या वेळी करण्यात आली. यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.