शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

...तर गणपतीत ‘काम बंद’चा चालकांचा इशारा

By admin | Updated: July 1, 2015 00:09 IST

एसटी महामंडळात तीन वर्षांपूर्वी भरती झालेल्या कनिष्ठ चालकांना त्यांच्या मूळ विभागात अद्यापही रुजू न केल्याने त्याच्या निषेध करीत ७२७ चालकांनी मंगळवारी मोर्चा काढला.

मुंबई : एसटी महामंडळात तीन वर्षांपूर्वी भरती झालेल्या कनिष्ठ चालकांना त्यांच्या मूळ विभागात अद्यापही रुजू न केल्याने त्याच्या निषेध करीत ७२७ चालकांनी मंगळवारी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केले. चालकांना मूळ विभागात रुजू न केल्यास गणेशोत्सव काळात काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. परळ कामगार मैदान ते मुंबई सेंट्रल असा हा मोर्चा काढण्यात आला.एसटी महामंडळाने २0१२ साली चालक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही भरती त्या त्या विभागांकरिता होती. यात नगर, लातूर, सोलापूर, अमरावती, सातारा, धुळे, नाशिकमधील चालकांचा समावेश होता. २0१२ साली चालकांची भरती झाल्यानंतर २0१४ साली या चालकांची बदली चालकांची टंचाई असलेल्या मुंबई व कोकण विभागात करण्यात आली. त्यानंतर या चालकांना त्यांच्या विभागात पुन्हा रुजू करण्यात आले नाही. चालकांची कधीही राज्याकरिता भरती झालेली नाही. तसेच यातील कोणत्याही चालकाने मुंबई किंवा कोकणात नोकरी मिळावी, असा अर्ज केलेला नाही. असे असतानाही महामंडळाचे अधिकारी चालकांना दिलेली नेमणूक बरोबर असल्याचा कांगावा करीत असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून सांगण्यात आले. महामंडळाच्या या कारभारामुळे ७२७ चालकांवर अन्याय झाला असून, ते भरती झालेल्या मूळ विभागात त्वरित बदली करावी, अशी मागणी युनियनकडून एसटी महामंडळाकडे या वेळी करण्यात आली. यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.