शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

...तर गणपतीत ‘काम बंद’चा चालकांचा इशारा

By admin | Updated: July 1, 2015 00:09 IST

एसटी महामंडळात तीन वर्षांपूर्वी भरती झालेल्या कनिष्ठ चालकांना त्यांच्या मूळ विभागात अद्यापही रुजू न केल्याने त्याच्या निषेध करीत ७२७ चालकांनी मंगळवारी मोर्चा काढला.

मुंबई : एसटी महामंडळात तीन वर्षांपूर्वी भरती झालेल्या कनिष्ठ चालकांना त्यांच्या मूळ विभागात अद्यापही रुजू न केल्याने त्याच्या निषेध करीत ७२७ चालकांनी मंगळवारी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केले. चालकांना मूळ विभागात रुजू न केल्यास गणेशोत्सव काळात काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. परळ कामगार मैदान ते मुंबई सेंट्रल असा हा मोर्चा काढण्यात आला.एसटी महामंडळाने २0१२ साली चालक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही भरती त्या त्या विभागांकरिता होती. यात नगर, लातूर, सोलापूर, अमरावती, सातारा, धुळे, नाशिकमधील चालकांचा समावेश होता. २0१२ साली चालकांची भरती झाल्यानंतर २0१४ साली या चालकांची बदली चालकांची टंचाई असलेल्या मुंबई व कोकण विभागात करण्यात आली. त्यानंतर या चालकांना त्यांच्या विभागात पुन्हा रुजू करण्यात आले नाही. चालकांची कधीही राज्याकरिता भरती झालेली नाही. तसेच यातील कोणत्याही चालकाने मुंबई किंवा कोकणात नोकरी मिळावी, असा अर्ज केलेला नाही. असे असतानाही महामंडळाचे अधिकारी चालकांना दिलेली नेमणूक बरोबर असल्याचा कांगावा करीत असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून सांगण्यात आले. महामंडळाच्या या कारभारामुळे ७२७ चालकांवर अन्याय झाला असून, ते भरती झालेल्या मूळ विभागात त्वरित बदली करावी, अशी मागणी युनियनकडून एसटी महामंडळाकडे या वेळी करण्यात आली. यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.