शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

... तर डॉक्टरांच्या संपाचे प्रकरण चिघळलेच नसते!

By admin | Updated: March 23, 2017 03:20 IST

आठवड्याचे चोवीस तास प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टरांना संपामुळे, सामान्यांचा व उच्च न्यायालयाचा रोष ओढावून घ्यावा लागला.

मुंबई : आठवड्याचे चोवीस तास प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टरांना संपामुळे, सामान्यांचा व उच्च न्यायालयाचा रोष ओढावून घ्यावा लागला. उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर, राज्य सरकारने व संबंधित महापालिकांनी संपकरी डॉक्टरांना नोटीस बजावली, तर या सर्व डॉक्टरांच्या समर्थनार्थ राज्यातील सुमारे ४० हजार डॉक्टर संपामध्ये सामील झाले. मात्र, यात गरीब रुग्ण भरडला जात आहे. हे चित्र बदलता आले असते. डॉक्टरांऐवजी डॉक्टरांना सुरक्षा न देणाऱ्या सरकारवर हे प्रकरण शेकू शकले असते, पण त्यासाठी ‘महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडेन्शियल डॉक्टर’ (मार्ड)ने अडेलतट्टूपणा बाजूला करत, उच्च न्यायालयात स्वत:हून धाव घेतली असती तरच...गेल्या काही दिवसांत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ, मार्डने संपाची हाक देण्याऐवजी स्वत:हूनच मूळ याचिकाकर्ते अफाक मांडविया यांच्या याचिकेत अर्ज दाखल करून, ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली असती, तर सद्यस्थिती वेगळी असती. उच्च न्यायालयाच्या रोषाला डॉक्टरांऐवजी राज्य सरकारला सामोरे जावे लागले असते. सामान्यांची सहानुभूती डॉक्टरांना मिळाली असती आणि रुग्णांचे हालही झाले नसते. गेल्या वर्षी डॉक्टरांनी संप केल्यानंतर, मांडविया यांनी संपाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या वेळी उच्च न्यायालयाने डॉक्टरांनी मार्डकडून भविष्यात संपावर न जाण्याचे लेखी आश्वासन घेतले. अशा प्रकारे न्यायालयाला लेखी आश्वासन दिल्यानंतर, मार्डने संपावर जाणे कायद्याने अयोग्य आहे. न्यायालयाचा अवमान केला आहे. मार्ड ही सगळी कारवाई थांबवू शकले असते आणि डॉक्टरांना ज्या मानसिक त्रासातून जावे लागत आहे, तेही टाळू शकले असते. गेल्याच वर्षी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन करणे राज्य सरकारसाठी बंधनकारक आहे. मात्र, तरीही राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले. राज्य सरकारच्या या चालढकल वृत्तीमुळे राज्यातील अनेक डॉक्टरांना मारहाण केली जात आहे, ही बाब मार्डने अर्जाद्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली असती, तर सरकारला उच्च न्यायालयात उत्तर द्यावेच लागले असते आणि तातडीने निर्देशांवर अंमलबजावणी करावी लागली असती. डॉक्टरांऐवजी आज सरकारवर अवमान नोटीस घेण्याची वेळ आली असती. मात्र, मार्डने याचिकाकर्त्यांनी अर्ज केल्यानंतर आपली भूमिका मांडली. न्यायालयाचा अवमान केल्यानंतर, मार्डने त्यांची भूमिका मांडली. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली. (प्रतिनिधी)